प्रतिबिंब प्रतिष्ठानचा लोकार्पण सोहळा व ‘महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२५’ चे भव्य आयोजन पुण्यात
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
पुणे, दि. २४ मे २०२५ :
महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी नवी दिशा आणि प्रेरणा देणाऱ्या ‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’ या संस्थेचा भव्य लोकार्पण सोहळा आणि ‘महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२५’ वितरण समारंभ रविवार, दिनांक २५ मे २०२५ रोजी स. ११ वाजता पुण्यातील JW Marriott हॉटेलमध्ये पार पडणार आहे.
हा उपक्रम डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र – मुंबई यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला आहे. पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण, उद्योग, ग्रामविकास, कला, मनोरंजन आदी विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा या सोहळ्यात गौरव करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. चंद्रकांतदादा पाटील (उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, संसदीय कार्यमंत्री) यांच्या हस्ते होणार असून, मा. अण्णा बनसोडे (उपाध्यक्ष – महाराष्ट्र विधानसभा) अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
पुरस्कार वितरणासाठी मा. जयकुमार गोरे (ग्रामविकास व पंचायतराज मंत्री) आणि डॉ. ओमप्रकाश शेटे (अध्यक्ष – आयुष्मान भारत मिशन, महाराष्ट्र) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. राजा माने यांनी स्पष्ट केले की, “हा सोहळा केवळ पुरस्कारांचे वितरण नाही, तर समाजपरिवर्तनाच्या दिशेने एक प्रभावी पाऊल आहे. नव्या पिढीच्या पत्रकारांसाठी प्रेरणादायी ठरेल असा हा उपक्रम आहे.”
महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२५
राज्यातील विविध भागांतील १८ मान्यवरांना विविध क्षेत्रांतील कार्यासाठी गौरवण्यात येणार आहे.
त्यामध्ये प्राचार्य डॉ. किरण सावे (पालघर) यांचे आदिवासी शिक्षण क्षेत्रातील कार्य, सचिन वायकुळे (बार्शी) यांचे तृतीयपंथीय व देहविक्रय क्षेत्रातील महिलांसाठीचे योगदान, उमाकांत मिटकर (धाराशिव) यांचे भटक्या-विमुक्त जमातीसाठीचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे.
तसेच बिग हिट मीडिया चे अनुष्का सोलवट, ऋतिक मणी आणि अनिल मणी यांना कला व मनोरंजन क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल गौरविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र महागौरव पत्रकारिता पुरस्कार २०२५
या पुरस्कारासाठी ५ नामवंत पत्रकारांची निवड करण्यात आली आहे – सरिता कौशिक (एबीपी माझा), साहिल जोशी (मुंबई तक), संजीव उन्हाळे, भारत चव्हाण (लोकमत), दिलीप सपाटे – यांनी पत्रकारितेमध्ये सातत्याने नवी उंची गाठलेली आहे.
नव्या युगातील डिजिटल पत्रकारितेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांमध्ये नितीन पाटील (पोलीसनामा), अश्विनी जाधव (लोकमत डिजिटल), अभिजीत दराडे (मटा डिजिटल), विष्णू सानप (लेटसअप), ओमकार वाबळे (मुंबई तक) यांचा समावेश आहे.
या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थापक अध्यक्ष मा. राजा माने यांच्या नेतृत्वाखाली सतीश सावंत, महेश कुगांवकर, नंदकुमार सुतार, केतन महामुनी, शामल खैरनार, राजू वाघमारे, विकास भोसले, तेजस राऊत, इक्बाल शेख, दिपक नलावडे, अमोल पाटील, अजिंक्य स्वामी, गणेश हुबे, प्रशांत साळुंके* यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.
हा सोहळा महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात नवचैतन्य निर्माण करणारा ठरणार आहे. नव्या पिढीला प्रेरणा देणाऱ्या या सोहळ्याच्या माध्यमातून प्रतिबिंब प्रतिष्ठान एक सक्षम, सामाजिकदृष्ट्या भान ठेवणारी संस्था म्हणून उदयास येत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
मा. श्री. राजा माने
संस्थापक अध्यक्ष
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना / प्रतिबिंब प्रतिष्ठान, मुंबई
मो. ९९२२९२८१५२