हो मी अरविंद पिसे माण खटावमधील जनतेच्या सहकार्याने माण-खटाव दुष्काळमुक्त करून दाखवतो! अरविंद पिसे यांचा दृढनिश्चय
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
माण-खटाव मतदारसंघातील पाणीप्रश्न नेहमीच गंभीर राहिला आहे. मात्र, यंदाच्या पावसाळ्यात परिस्थितीत सुधारणा झाली असून, या पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास माण-खटावला दुष्काळमुक्त करता येईल, असा विश्वास प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे यांनी व्यक्त केला आहे.
पाण्याची उपेक्षा आणि त्याची किंमत:
अरविंद पिसे यांनी सांगितले की, माण-खटावमध्ये यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस पडला असून, येरळा नदी गेल्या दीड महिन्यापासून वाहत आहे. माण तालुक्यात गेल्या पाच सहा दिवसापासून माण तालुक्यातील माण नदीवरील सर्व बंधारे तसेच शेवटचा राऊतवाडी येथील बंधारा भरून वाहू लागला आहे. आता गेल्या पाच दिवसापासून माण तालुक्यातून माणगंगा नदीतील पाणी राजेवाडी तलावात जात आहे या नदीवरील सर्व बंधारे भरून, पाणी तालुक्याबाहेर वाहून जात आहे. पिसे यांच्या मते, हे पाणी जर योग्य पद्धतीने साठवले गेले तर, माण-खटाव दुष्काळमुक्त होऊ शकतो.
*विकासासाठी ठोस उपाययोजना:
पिसे यांनी मांडलेल्या योजना अनुसार, माण-खटावमधील बंधाऱ्यांमध्ये साठवले जाणारे पाणी जवळपासच्या तलावांमध्ये सोडले जाऊ शकते. यासाठी बंधाऱ्यांच्या बाजूला पंपहाऊस बांधून, मोटारीद्वारे पाणी तलावांमध्ये सोडण्याचे नियोजन केले जाईल. पिसे यांनी असेही सुचवले आहे की, तलावांच्या क्षमतेत वाढ करून, किंवा नवीन तलाव तयार करून, पाण्याचा साठा वाढवला जाऊ शकतो.
*शेती आणि रोजगारासाठी संधी:
यामुळे माण-खटाव परिसरातील शेतीला पुरेसे पाणी मिळेल, ज्यामुळे चारपट जमीन लागवडीसाठी उपलब्ध होऊ शकते आणि लोकांच्या हाताला काम मिळू शकेल. पिसे यांनी सांगितले की, हा उपाय माण-खटाव दुष्काळमुक्त करण्यासाठी अत्यंत गरजेचा आहे, आणि यासाठी कोणत्याही थराला जाऊन या गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे.
*प्रमुख नेत्यांची सहकार्याची ग्वाही:
या योजना राबवण्यासाठी, प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते मा. ना. बच्चुभाऊ कडूसाहेब यांच्याशी अरविंद पिसे यांनी सविस्तर चर्चा केली आहे. कडूसाहेबांनी या योजनेला आपली मर्जी दाखवली असून, सरकारला आवश्यक निधी मंजूर करण्यासाठी योग्य ती रणनीती आखण्याचे आश्वासन दिले आहे.
*2024 विधानसभा निवडणूक आणि पाणीप्रश्न:
2024 ची माण-खटाव मतदारसंघातील विधानसभा निवडणूक प्रहार जनशक्ती पक्ष लढवणार आहे, आणि या निवडणुकीसाठी अरविंद पिसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पिसे यांनी पाणीप्रश्न हा प्रहार पक्षाचा मुख्य मुद्दा असल्याचे स्पष्ट केले आहे, आणि मतदारांनी त्यांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे.
पिसे यांनी दिलेल्या योजनांनुसार, माण-खटाव दुष्काळमुक्त होईल, शेतीला पाणी मिळेल, रोजगाराच्या संधी निर्माण होतील, आणि आर्थिक सुबत्ता वाढेल. या योजनेचा भाग होण्यासाठी, सुज्ञ मतदारांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अरविंद पिसे यांना निवडून देणे अत्यंत गरजेचे आहे, असे पिसे यांनी आवाहन केले आहे.
अरविंद पिसे,
जिल्हाध्यक्ष, सातारा.
प्रहार जनशक्ती पक्ष