व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड माणदेशी तरंग वाहिनी ,युनिसेफ आणि स्मार्ट यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसवड नगर परिषद म्हसवड येथे जलसंवर्धन जनजागृती अभियानचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले.
यावेळी माणदेशी तरंग वाहिनीचे कार्यक्रम संचालक अनुप गुरव यांनी उपस्थितांशी संवाद साधला . यावेळी अनुप गुरव यांनी “आपण आपल्या जीवनात विविध मार्गाने पाण्याची बचत करू शकतो. आपल्या घरामध्ये ज्या छोट्या गोष्टी आहे त्याने आपण पाणी वाचवू शकतो.” असे वक्तव्य केले तसेच त्यांनी त्यांनी ५ चॅलेंज सांगितले त्यामध्ये शॉवरने अंघोळ न करता बदली ने करा तसेच नळ लिकिंज होत असेल तर दुरुस्त करा, शोषखड्डे असे अनेक उपाय सांगितले व “why waste” हे ॲप डाऊनलोड करण्याचा सल्ला सुद्धा दिला
त्याचबरोबर या कार्यक्रमात उपस्थित असलेले सुवर्णा फलले यांनीसुद्धा “मी खरे तर अशा भागातून आले आहे जिथे खर तर पाण्याची काही कमी नाही परंतु म्हसवड सारख्या दुष्काळी भागात मला असे निदर्शनास आले की इथे खरंच पाणी खूप जपून वापरले जाते परंतु त्यातसुद्धा आपण अजून रोजच्या जीवनात बदल करून अजून किती पद्धतीने पाणी वाचवू शकतो हे कळले” असे वक्तव्य केले. तसेच सरतापे यांनी “आजच्या जीवनात अन्न, वस्त्र, निवारा याचबरोबर पाणी ही सुद्धा माणसाची प्राथमिक गरज आहे आणि त्याची बचत आपण केलीच पाहिजे” असे सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी निवेदिका कांचन ढवण यांनी “Why Waste” हे ॲप कसे डाऊनलोड करायचे आणि त्यावर आपण रोजच्या रोज किती पाण्याची बचत करतो आहोत हे कसे पाहायचे हे सांगितले.