भोईसमाज आरक्षणाच्या एल्गाराला पुर्ण विराम नाहि…

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

राजीव देव
सातारा :प्रतिनिधी

     येवला येथे पार पडलेला आरक्षण बैठकीत पुकारलेल्या एल्गाराला पुर्ण विराम नाहि एकीकडे लोकसभे च्या रणधुमाळी सुरु असताना महाराष्ट्रात मोठे मोठे नेते दौ-यावर विविध शहराना सभा, बैठका घेत असतात त्यातच भोईसमाजाचे काहि कर्तव्य दक्ष समाजबांधव आपल्या आरक्षणाच्या मुद्द्याला पुर्णत्वास नेण्यास आलेल्या संधीचा फायदा घेत मोठ मोठ्या नेत्यांन पर्यंत आपली बाजु भक्कम पणे मांडण्यासाठी सज्ज असतात 

      त्या पैकीच भोईसमाज आरक्षणा सह इतर मागण्यांना पुर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नास असणारे श्री शशांक झिटे व समाज बांधव यांनी काल मा श्री शशांक सुभाष झिटे यांच्या वतीने माननीय मंत्री महोदय चंद्रकांत दादा पाटील यांना भोई समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात निवेदन देण्यात आले                 

     निवेदन देताना शशांक सुभाष झिटे सातारा त्याचबरोबर माजी नगरसेवक श्री सुनील कोळेकर, नगरसेवक विजय कुमार काटवटे, अॅड. शुभांगी विजय काथवटे व इतर समाज बांधव उपस्थित होते, लोकसभेची रनधुमाळी पुर्णत्वास येताच मा मुख्यमंत्री साहेबांची भेट घडवुन आणण्याचे त्यांनी ह्यावेळी आश्वासन उपस्थितांना दिले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!