यशवंत विचार भावी पिढीला पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे : अजित पवार
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते
कराड: प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार कराड नगरीचे सुपुत्र स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या 111 जयंतीनिमित्त कराड येथील प्रीती संगम समाधीस्थळी जाऊन आदरांजली वाहिली
तसेच पी डी पाटील प्रतिष्ठान गौरव प्रतिष्ठान यांच्यावतीने कराड येथील प्रीतिसंगम या समाधीस्थळी “शब्द सुरांची भावपूर्ण आदरांजली” वाहण्यात आली, यावेळी माध्यमिक शाळांमधील १२००० विद्यार्थी – विद्यार्थिनींनी समूह गीत गायनाद्वारे आदरांजली वाहिली.

यावेळी अजितदादा पवार यांनी मार्गदर्शन करताना प्रतिष्ठान राबवत असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले, व यशवंत विचार भावी पिढीला पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजचे आहे असे प्रतिपादन केले.
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.नामदार अजितदादा पवार, खासदार सुनील तटकरे, माजी सहकार व पणन मंत्री आमदार बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, संजीवराजे नाईक-निंबाळकर, सारंग पाटील, अशोकराव गुजर, ॲड.मानसिंगराव पाटील, प्रकाश पाटील(बापू), सौ.शोभा पाटील, सौरभ पाटील, नंदकुमार बटाणे, सुहास पवार, गंगाधर जाधव, जयंत बेडेकर, राजेंद्र माने, दिलीपराव चव्हाण, ए. एन. मुल्ला, संभाजीराव पाटील, प्रा.रामभाऊ कणसे व नागरीक उपस्थित होते.


