सन 2022-23 साठी घेण्यात आलेल्या भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचा जिल्हास्तरीय निकाल जाहीर सातारा जिल्ह्यात माण तालुक्यात किरकसाल प्रथम तर खटाव तालुक्यात निढळ द्वितीय,मांडवे तृतीय

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )

म्हसवड

           अटल भूजल योजने अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत सातारा जिल्ह्यात माण तालुक्यात किरकसाल ग्रामपंचायतीने  प्रथम क्रमांक पटकावला तर खटाव तालुक्यातील निढळ ग्रामपंचायतीने   द्वितीय व,मांडवे ग्रामपंचायतीने  तृतीय क्रमांक मिळवला आहे

             राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार हा 1 कोटी रुपयांचा राज्यस्तरीय द्वितीय पुरस्काराची रक्कम 50 लाख असून तृतीय पुरस्कार 30 लाख रुपयांचा आहे. तर जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकास 50 लाख रुपये, द्वितीय क्रमांकास 30 लाख व तृतीय क्रमांकास 20 लाखांचे पारितोषिक आहे. ग्रामपंचायतींना राज्य व जिल्हास्तरीय पुरस्काराची रक्कम अटल भूजल योजनेंतर्गत राज्यास प्राप्त होणाऱ्या प्रोत्साहन निधीमधून अदा केली जाणार आहे.

          अटल भूजल योजनेच्या अंमलबजावणीमध्ये योजनेत समाविष्ट ग्रामपंचायतीमधील अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे व सर्वांनी गावातील भूजल व्यवस्था शाश्वत राखण्याकरीता मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा यासाठी गावा – गावांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होण्याच्या दृष्टीने व अटल भूजल योजनेचे मुख्य उद्दिष्ट “लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन” साध्य होण्यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे अटल भूजल योजनेंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अटल भूजल योजनेंतर्गत उत्कृष्ट लोकसहभाग नोंदविणाऱ्या व काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना सन 2022-23 व 2023-24 या दोन आर्थिक वर्षांसाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

         सन 2022-23 मध्ये महाराष्ट्रातील योजनेत समाविष्ट पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, जालना, लातूर, धाराशीव, बुलढाणा, अमरावती, नागपूर या 12 जिल्ह्यातील 270 ग्रामपंचायतींनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. एकूण 550 गुणांसाठी स्पर्धा घेण्यात आली होती

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!