दंडेलशाहीने जबरदस्तीने कार्यवाही करण्याचा प्रयत्न झाला तर मेढरांसहीत जिल्हाधिकारी कार्यालयावर लाॅगमार्च काढण्याचा निर्धार… भारत पाटणकर
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड प्रतिनिधी –
जो पर्यंत प्रकल्पाची तपासणी होत नाही तोपर्यंत भूसंपादन पुढे चालू ठेवण्याचा अधिकार कोणत्याही अधिकाऱ्यांना नाही हे कायद्यात म्हटलं आहे जिल्हाधिकारी आणि धुळदेव ग्रामस्थ यांच्याशी चर्चा केल्याशिवाय पुढील भूसंपादनाची कार्यवाही होऊ नये…असे वक्तव्य श्रमिक मुक्ती संघटनेचे अध्यक्ष भारत पाटणकर यांनी केले
ते बीएमआयसी काॅरिडाॅरला धुळदेव ग्रामस्थांनी विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर धुळदेव येथील मंदीरातील बैठकीत ते बोलत होते. यावेळी सरपंच राणी दुर्याधन कोळेकर, उपसरपंच दत्ता कोळेकर, अॅड शिवाजी कोळेकर, ज्ञानदेव कोळेकर यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामस्थांनी निर्णय घ्यायचा आहे सुनावणी घेतल्या शिवाय कायद्याच्या आधारावर आम्ही सांगितलेले पर्यायांवर निर्णय घेतले जावेत . कायद्याप्रमाणे वागणे अधिकाऱ्यांचे चे कर्तव्य आहे. जर ते वागत नसतील तर येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मेढरांसह ग्रामस्थांनी मोर्चा काढणार असा निर्णय झाला. मेंढरे आणी शेती हे आमचे जीवन आहे त्यावर कोणी गदा आनू नये. जनतेचे जीवन जाणार का राहणार सरकारला कोडं सोडवायचे आहे? आमच्या मागण्या मान्य करा.. श्रमिक मुक्ती संघटना जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठीच आहे. जनतेच्या प्रश्नांचे निरसन करणे हे अधिकार्याचे कर्तव्य आहे. सुनावणी झाल्यानंतर दंडेलशाहीने जबरदस्तीने कार्यवाही करण्याचा प्रयत्न झाला तर मेढरांसहीत लाॅगमाचॅ काढण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. शेतकऱ्यांचे जीवन भकास करुन विकास करु नये. उद्योगासाठी अभ्यास करुन जमिनी एमआयडीसीसाठी जनतेच्या मान्यते शिवाय एक पाऊलही पुढे टाकू शकत नाही जर पाऊल ठेवायला जाल तर याद राखा हे लोक धुळदेव ची जनता एकटी नाही महाराष्ट्रातील जनता त्यांच्या बरोबर लढायला तयार आहे.देशाला व जनतेच्या हिताचा एखादा प्रकल्प येत असेल तर त्या प्रकल्पाची तपासणी करण्याची सोय आहे तो प्रकल्प जनतेला व देशाला हानिकारक असेल तर तो न करता दुसरा कुठला पर्याय करता येईल का हे पाहावे असा कायदा जनतेच्या लढ्यातून कायदा करुन घेतला आहे. “कष्टकरी जनतेच्या विजय असो कोण म्हणतो घेणार, देणार नाही..”. अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या