आर आर पाटील लोक विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य तर्फे वनविभाग कार्यालय सातारा येथे बेमुदत आमरण उपोषण व हलगीनाद आंदोलन

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
 सातारा
झोपलेल्या वन विभागाला जागे करण्यासाठी आर आर पाटील लोक विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य तर्फे वनविभाग कार्यालय सातारा येथे  १६ नोव्हेंबर पासून बेमुदत आमरण उपोषण व हलगीनाद आंदोलन सुरु आहे आज या आंदोलनाचा पाचवा दिवस असून शासनाकडून अद्याप याची कसलीही दखल घेण्यात आलेली नाही 
सातारा जिल्ह्यातील सामाजिक वनीकरण विभाग सातारा अतर्गत येणाऱ्या माण दहिवडी,, वडूज खटाव,  कोरेगाव तालूक्यासह इतर सर्व तालुक्यांमध्ये वृक्ष लागवड योजनेमध्ये पाणी व खते न देता बोगस कागद पत्रे तयार करून सामाजिक वनीकरण विभागाचा शासकीय निधी सुमारे १०७ कोटी रुपये अधिकारी यांनी स्वत: हडप करून आर्थिक घोटाळा केला असल्याने माण दहिवडी येथील वन क्षेत्रपाल, भाग्यश्री ठाकुर ,वडूज खटाव येथिल वनक्षेत्रपाल अर्जुन गंबरे,  कोरेगाव येथील वनक्षेत्रपाल राहूल काळे या सर्वानी व इतर तालूक्यातील वनक्षेत्रपाल यांनी व वरिष्ठ विभागीय वनाधिकारी हरिश्चंद्र वाघमोडे तत्कालीन विभागीय वन अधिकारी धर्मवीर साल विठ्ठल यांनी संगनमत करून शासकीय निधी हडप करून मोठा भ्रष्टाचार केला आहे, या घोटाळ्यातील सर्व दोषींवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत बेमुदत आमरण उपोषण व हालगी नाद आंदोलन सुरूच राहणार असल्याचे दादासाहेब चव्हाण संस्थापक अध्यक्ष आर आर पाटील लोक विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य,यांनी सांगीतले आहे या आंदोलनात आदोलंन करते, आर आर पाटील लोक विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष दादासाहेब चव्हाण,सैदागर मोरे, सुनिल विभूते, गजेंद्र कांबळे, विकास काबळे, आशोक नागने, युवराज श्रीखंडे, विजय डावरे, आनिल डावरे सदाशिव पाटिल महादेव डावरे, अभिजित श्रीखंडे ,इत्यादी कार्यकरते उपोषणास बसले आहेत,आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे पण संबंधित विभागाने त्यांची अद्याप कसलीही दखल घेतलेली नसल्याचे दादासाहेब चव्हाण यांनी सांगीतले

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!