जिल्हा बँकेच्या योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सामान्य घटकांची आर्थिक उन्नती: उपाध्यक्ष अनिल देसाई सभेत विविध योजनंची माहिती, विकास सेवा संस्थांचा मोलाचा वाटा.

बातमी Share करा:

व्हिजन २४तास न्यूज

प्रतिनिधी ;   दौलत नाईक 
दहिवडी:
              देशामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक अग्रगण्य असून या यशात विकास सेवा संस्थांचा मोलाचा वाटा आहे, बँकेच्या ठेव व कर्ज योजनांची माहिती विकास संस्थांचे चेअरमन, सचिव यांना असणे आवश्यक आहे, तसेच विकास सेवा संस्था सक्षम होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन सातारा जिल्हा बँकचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी केले.
   दहिवडी ता. माण येथिल  बँकेचे विभागीय कार्यालयात बँकेच्या कर्ज वसुली उदिष्ट, ठेवी, वाटप, संपूर्ण क.म.पत्रक, शेअर्स, मायक्रो एटीएम, नवीन सभासद वाढ, मध्यम दीर्घ मुदत कर्जवाटप, किसान क्रेडीट कार्ड योजनेअंतर्गत कर्जवाटप,सोसायटया संगणकीकरण करणे, गोडावून उभारणी, स्वयंसहाय्यता बचत गट, थेट कर्ज योजना आदी कामातील अडचणी, बँकेच्या सभासद संस्थांच्या सूचना व त्यांचे निराकरण या कामाला गती देण्याचे उद्देशाने बँकेच्या नियोजन, विकास व पाठपुरावा उपसमितीच्या आयोजित सभेत ते बोलत होते.
   यावेळी बँकेचे संचालक माजी आमदार प्रभाकर घार्गे, प्रदीप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजेंद्र भिलारे, व्यवस्थापक  शेखर शिंदे,  विकास सेवा संस्थांचे चेअरमन,व्हा.चेअरमन,सचिव आदींची उपस्थिती होती .
    अनिल देसाई म्हणाले, विकास सेवा संस्थांना आपल्या सभासदांच्या अडीअडचणी व समस्या माहित असतात. सदर अडचणी या सभेमध्ये मांडल्या पाहिजेत.आपल्या सूचना,अडचणी,प्रश्न व समस्यांचा बँक जरुर विचार करील. देशामध्ये बँक अग्रगण्य असून विकास सेवा संस्थांचा मोलाचा वाटा आहे.बँकेचे कामकाज उत्कृष्ठ असलेमुळे बँकेला दशकातील उत्कृष्ठ बँक म्हणून NAFSCOB या संस्थेने गौविले असून सदर पुरस्कार केंद्रीय गृह व सहकार मंत्री ना. अमित शहा यांचे हस्ते प्रदान करणेत आला. बँकेच्या माध्यमातून विविध कर्ज, ठेव व आधुनिक बँकिंगच्या सेवा व सुविधा मिळत आहेत ही अभिमानाची बाब आहे.  बँकेच्या ठेव व कर्ज योजनांची माहिती विकास संस्थांचे चेअरमन, सचिव यांना असली पाहिजे. विकास सेवा संस्था सक्षम होणेसाठी प्रयत्न केले पाहिजेत. बँकेच्या शैक्षणिक कर्ज,कृषि पर्यटन,गृहकर्ज,गोडावून बांधकाम, प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती बिमा योजना, रेशनिंग दुकानदार, कॅश क्रेडिट कर्ज, युपीआय सेवा इ.योजनांचा लाभ सर्वांना झाला पाहिजे. सामान्य घटकांसाठी बँकेच्या विविध योजना असून त्याचा लाभ विकास सेवा संस्थांचे माध्यमातून झाला पाहिजे. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत योजना, मा.मुख्यमंत्री रोजगार निर्मित्ती कार्यक्रम अंतर्गत योजना व अन्य महामंडळाच्या अनुदान योजना असून त्यांचा बँकेच्या शेतकरी सभासद, कर्जदार, ग्राहक यांना लाभ झाला पाहिजे. नॅशनलाईज बँका ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा देत असून ग्राहकांना मायक्रो एटीएमच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा दिली पाहिजे.
  प्रभाकर घार्गे म्हणाले,बँकेने राज्यातच नव्हेतर देशात सर्वोत्कृष्ठ बँक म्हणून नावलौकिक मिळविला आहे.बँकेची स्थापना यशवंतराव चव्हाण,आर.डी.पाटील,किसन वीर इ. थोर नेत्यांनी सर्वसामान्य शेतकरी सभासदांचे हित डोळयासमोर ठेवून केली. सामान्य,कष्टकरी व गरीब घटकांची आर्थिक उन्नती होणेसाठी विकास सेवा संस्थांनी बँकेच्या योजनांचा प्रचार व प्रसार केला पाहिजे. विकास सेवा संस्थांनी नवीन योजना,व्यवसाय वाढ,संस्थेचा खर्च, उत्पन्न वाढ इत्यादि बाबत प्रयत्न केले पाहिजे. विकास सेवा संस्था केंद्र शासनाने सूचित केलेप्रमाणे सॉफ्टवेअरद्वारे जोडल्या जाणार आहेत,त्यामुळे सचिवांनी कामकाजामध्ये सुधारणा केली पाहिजे.जिल्हयातील कोरडवाहू,बागायत,अतिपर्जन्यमान, दुष्काळी भाग सर्व बाबींची विचार करुन संपूर्ण जिल्हयासाठी सर्वसमावेशक योजना राबिली जाते.माण तालुक्यात कर्जाची थकबाकी १०० टक्के वसुली होईल यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत.कर्ज वाटपाचे प्रमाण वाढविले पाहिजे.थकबाकी असणा-या सभासदांना शासनाच्या योजनांचा लाभ होत नाही.दुष्काळी भागातील लोकांनी याचा फायदा झाला पाहिजे.बँकेची नवीन योजना विकास अधिकारी,सचिव यांनी सभासदापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत.लम्पी आजार आता संपलेला असून गाई,म्हैशीचे बाजार पुन्हा सुरु करून चांगली जनावरे खरेदी करणेसाठी बँक कर्ज मर्यादेत वाढ करील.आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा शेतकरी सभासदांना लाभ झाला पाहिजे .
   डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले,आपल्या जिल्हयातील ९५३ विकास संस्थांपैकी ९१३ विकास संस्था नफ्यात आहेत.आपल्या तालुक्यातील ७३ पैकी ७० विकास संस्था नफ्यात असून ही बाब चांगली आहे.विकास सेवा संस्थांनी खर्चात काटकसर केली पाहिजे.नफा वाढविला पाहिजे व विकास सेवा संस्थांनी सभासदांना लाभांश वाट केले पाहिजे.पीक कर्ज वाटपात विकास संस्थांचे योगदान मोलाचे असून त्यांनी पारंपारिक व्यवसाय न करता विविध योजनांचे माध्यमातून व्यवसाय वाढ केली पाहिजे.कर्ज वसुली नियमित होईल याची दक्षता घेतली पाहिजे.सामान्य घटकांना बँकेच्या योजनांचा लाभ झाला पाहिजे. बँक जिल्हयातील विकास सेवा संस्थांची मातृसंस्था असून विकास सेवा संस्थांनी सभासदांसाठी चांगले काम केले पाहिजे. बँक कर्जपुरवठा करणेबरोबर सामाजिक बांधिलकी जपते. शासनाच्या अनुदान योजनांचा लाभ सामान्य घटकांना झाला पाहिजे. उत्पन्नाची नवीन साधने शोधली पाहिजेत. विकास संस्थांनी ट्रॅक्टर, मळणी यंत्र, रेशनिंग दुकान, पेट्रोल पंप, कोल्ड स्टोअरेज, गोडावून इत्यादि व्यवसाय केले पाहिजेत, या व्यवसायातून अधिक उत्पन्न मिळविले पाहिजे. विकास सेवा संस्थांचे संगणकीकरण होणार असून त्या जिल्हा मध्यवर्ती बॅँका,नाबार्ड व शासनाशी जोडल्या जाणार आहेत,त्यामुळे विकास सेवा संस्थांनी कामकाजात सुधारणा करावी.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!