वडोली निळेश्वर ग्रामपंचायत ची ग्रामसभा घरकुल प्रश्नावरून वातावरण तापले ग्रामसभा नियमबाह्य झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कराड कुलदीप मोहिते प्रतिनिधी
कराड तालुक्यातील वडोली निळेश्वर 18 रोजी विशेष ग्रामसभा बोलवण्यात आली होती पंतप्रधान आवास योजनेतील पात्र अपात्र घरकुल विषयावरून वादळी चर्चा झाली सभेचे अध्यक्ष सरपंच भीमराव मदने यावेळी संभाजी पवार ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते
घरकुल पात्रतेच्या यादीसाठी झालेल्या ठरावाचा सूचक रोहित डुबल. तर अनुमोदक अविनाश डुबल यांनी दिले यावेळी ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांना ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडून समर्पक उत्तर न मिळाल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक पवित्रा घेतला नंतर ग्रामसेविका पुष्पा कोळी यांनी अपात्र घरकुलातील14 घरकुल पात्र करून ती यादी पंचायत समिती पाठवली असल्याचे सांगितले या यादीतील नावे वाचून दाखवली यानंतर पात्र घरकुल साठी ग्रामस्थांनी सहमती दर्शवली मात्र उर्वरित अपात्र यादीसाठी ग्रामसभेची सहमती दर्शवली नाही घरकुल प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे संभाव्य यादीत अनेक नावे असतात शासनाच्या निष्कर्षाप्रमाणे यादी शहानिशा ग्रामपंचायतचा ठराव ही सर्व प्रोसिडिंग करावी लागते त्याला विलंब लागतो ग्रामसभेत ठराव मंजूर करून तो पंचायत समितीकडे पाठवला जातो लाभार्थी साठी शासन अनुदान देते परंतु घरकुलाचा प्रश्न संभाव्य यादीत टप्प्याटप्प्याने पूर्ण होतो यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात असे काही जाणकार नागरिक चर्चा होती काही ठिकाणी संभाव्य यादीत नाव आहे परंतु घरकुल चा नंबर आला नाही अशी परिस्थिती निर्माण होते तोपर्यंत घरकुल प्रतीक्षेत राहावे लागत असते प्रत्येक गावात अशीच परिस्थिती निर्माण आहे असे काही जाणकार नागरिक सांगतात पात्र घरकुल यादी साठी आमची सहमती आहे मात्र उर्वरित अपात्र यादीसाठी आमची सहमती नाही अपात्र यादीसाठी कोणते निकष लावले आहेत याची माहिती मिळावी ग्रामस्थ अविनाश डुबल वडोली निळेश्वर अपात्र घरकुल घरकुलातील तपासणी अंती14 घरकुल पात्र झाली असून ही नावाची यादी पंचायत समितीकडे मंजुरीसाठी पाठवली आहे वरिष्ठांचा आदेशानुसार पुढील कारवाई होईल ग्रामसेवक पुष्पा कोळी वडोली निळेश्वर यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे या ग्रामसभेची चर्चा परिसरात व गावात सुरू होती शासन दरबारी काय निर्णय होतोय याकडे गावाचं लक्ष व घरकुल लाभार्थी यांचं लक्ष लागून राहिले आहे घरकुल प्रकरणामुळे तालुक्यामध्ये चांगली चर्चा इतर गावागावात सुरू आहे