म्हसवड… प्रतिनिधी म्हसवड, कुकडवड मायणी हा माण खटाव तालुक्याला जोडणारा महत्त्वपूर्ण मार्ग आहे. या रस्त्याची अनेक ठिकाणी दुरावस्था झाल्याने प्रवासी त्रस्त झाले असून भविष्यातील वाहतुकीचा विचार करता या रस्त्याची मजबूत बांधणी करावी अशी मागणी कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी केली आहे
म्हसवड कुकडवाड मायणी या रस्त्यावर प्रचंड वाहतूक आहे . हा रस्ता माण तालुक्यातून सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा जवळचा मार्ग आहे.
माण तालुक्यातील दक्षिण भागाला जोडणारा सुद्धा हा एक महत्वपूर्ण रस्ता आहे. म्हसवड सिद्धनाथ मंदिर दर्शनासाठी येणाऱ्या भाविक वाहनधारकाची संख्याही खूप मोठी आहे. या रस्त्याकडे नेहमीच बांधकाम विभागाची दुर्लक्ष आहे. केवळ मलमपट्टी करून ठेकेदार व अधिकारी आपले उकळ पांढरे करून घेत असतात, त्याकडे लोकप्रतिनिधी ने लक्ष देणे गरजेचे असल्याचे बाबर यांनी स्पष्ट केले.
म्हसवड कुकुडवाड दरम्यान रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे हे समजत नाही. नर बटवाडी वडजल दरम्यान कॅनॉल नजीकचा रस्ता गेले अनेक महिने विकासाच्या नावाखाली उघडलेल्या स्वरूपात आहे. कुकडवड गाव ते खिंड दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे आहेत. भविष्याची गरज म्हणून खिंडीतला रस्ता रुंद करणे गरजेचे आहे.
सदर रस्त्याची दुरावस्था असल्याने वाहनधारक तसेच प्रवासी यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहनाचे टायर व इंधन याचा अनावश्यक खर्च वाढत आहे. तसेच प्रवासाची वेळ ही वाया जात आहे. या रस्त्याची मजबूत बांधणी होणे कामे पंचक्रोशीतील स्थानिक लोकप्रतिनिधींनी वरिष्ठा कडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे. प्रवासी व स्थानिक जनता यांची गरज लक्षात घेता या रस्त्याची तातडीने मजबूत बांधणी करावी अशी मागणी विश्वंभर बाबर यांनी केली आहे.