. राजाशिवछत्रपती सामाजिक संस्था व वनविभाग परिक्षेत्रयांच्या संयुक्त विद्यमानाने कराड व ग्रामपंचायत शामगांव यांच्या माध्यमातून, विद्यार्थी विद्यार्थ्यांनी अतिशय प्रेरणादायी असा वृक्ष लागवडीचा व संवर्धनाचा संदेश दिला आहे
कराड तालुक्यातील शामगाव हे गाव आहे निसर्गाच्या कुशीत वसलेले गाव आहे. वारकरी संप्रदाय परंपरा लाभलेले हे गाव आहे या गावाला प्राचीन शिवमंदिर आहे गावाला प्रवेश करण्यासाठी घाटातून प्रवास करावा लागतो या ठिकाणी घाट परिसरात प्राचीन मंदिर आहे .वन विभाग कराड व सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सहकाऱ्यांनी सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने ग्रामस्थांच्या सहकाऱ्यांनी शामगाव घाटाच्या मंदिराच्या परिसरात 600 झाडांचे वृक्षारोपण करून निसर्ग संवर्धनाचा प्रेरणादायी असा संदेश विद्यार्थ्यांकडून यावेळी दिला गेला आहे.
यामध्ये पिंपळ. लिंब. जांभळ; शिवण करंज; सागवान; वड. या झाडांचा समावेश यामध्ये आहे यासाठी सातारा जिल्ह्यातील महाविद्यालयाने विद्यार्थ्यांनी सहभाग मोठ्या प्रमाणात घेतला होता. यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा.; यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज कराड ;सदगुरु गाडगे महाराज कराड बाळासाहेब देसाई महाविद्यालय पाटण; जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शामगाव, ओंकारनाथ विद्यालय शामगाव 350 विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून एक कुटुंब एक झाड वृक्षारोपण कार्यक्रम हाती यावेळी घेण्यात आला
यावेळी महाराष्ट्र राज्याचे सहसचिव गृह विभाग वैभव राजे घाडगे; वन क्षेत्र पाल सातारा तुषार नवले, उद्योजक सुरेश पोळ, ग्रामस्थ वन विभागाचे अधिकारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मान्यवरांनी वृक्षाचे महत्व सांगितले सध्या घडीलावाढत्या औद्योगीकरणामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होऊन पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. त्यासाठी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.