भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने येथे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये सकाळी देशभक्ती पर घोषणा देत प्रभातफेरी काढण्यात आली .तदनंतर मुख्याध्यापक सुशील त्रिगुणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
राष्ट्रगीत, ध्वजगीतयानंतर मुलींनी महाराष्ट्र राज्य गीत जय जय महाराष्ट्र माझा हे गीत उत्कृष्ट सादर करण्यात आले. तदनंतर पल्लवी जगताप यांनी मुलांचे कवायत प्रकार वाद्यच्या तालावर घेण्यात आले. मुलींना आत्मनिर्भर बनविण्यासाठी कराटे प्रशिक्षक यांनी कराटे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. विविध प्रकारच्या गाण्यावर मुलांनी उत्कृष्ट नृत्याविष्कार सादर केला. अंगणवाडी सह इयत्ता पहिली पासून मुलानी प्रजासत्ताक दिनाच्या विषयावर इयत्ता पहिली तील आराध्या विरकर, समृद्धी गलांडे,शंभू विरकर, प्रतीकविरकर यांनी भाषणे केली.इयत्ता तिसरी तील प्रणिती खुडे हिने इंग्रजी तुन,श्रेया वीरकर, हिने हिंदी तुन, ज्ञानेश्वरी विरकर हिने इंग्रजी तुन उत्कृष्ट भाषणे सादर केली.स्कुल चले हम, देश हे वीर जवानोका ,हम इंडिया वाले,कोळी गीत यावर उत्कृष्ट रेकॉर्ड डान्स पाहून पालकांचे डोळ्याचे पारणे फिटले. 3री ते 5 वी मुलानी मानवी मनोरे सादर केले .प्रसाद विरकर याने ए मेरे वतन के लोगो तसेच साहिल जठरे याने ए देश मेरे हे गीत सादर केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विशाल विरकर यांनी उपस्थित लोकांना लोकसहभागातून करावयाच्या कामाची माहिती दिली तसेच लोकसहभाग मोठया प्रमाणात करण्याचे आवाहन केले. माजी सैनिक शिवाजी जावीर यांनी मुलांना आपल्या जीवनात शिस्तीचे महत्त्व सांगितले .सकाळी पहाटे उठुन व्यायाम करणे, पळणे यासह विविध प्रकारचे व्यायाम प्राणायाम करणे आपल्या शारीरिक व मानसिक स्वास्थसाठी आवश्यक असल्याचे सांगितले. व मुलानी देश हितासाठी व देशरक्षणासाठी सदैव तयार राहण्याचे आवाहन केले. तबाखूमुक्त गाव ,शाळा परिसर राहण्यासाठी शिक्षिका अनिता तोरणे यांनी सर्व विद्यार्थी व पालकांना तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली. तसेच शिक्षिका शुभांगी रणदिवे यांनी शाळेची यशोगाथा सांगितले तसेच तंबाखू मध्ये असणारे घटक व त्याचे आपल्या शरीरावर काय दुष्परिणाम होतात याचे महत्त्व पटवून दिले.
शिक्षिका पूनम शेंडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्कृष्ट केले. जळजीवन व पाणीपुरवठा विभाग सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील द्वितीय क्रमांक आलेली अंकिता विरकर हिचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. उपस्थित सर्वांचे कांतीलाल खाडे यांनी आभार मानले. कार्यक्रमसाठी माजी केंद्रप्रमुख जगन्नाथ विरकर, माजी नगरसेवक खंडू गलंडे, आप्पा विरकर,मनिशाताई विरकर ,माजी अध्यक्ष समीनदर विरकर,शाळा व्यवस्थपण समिती सदस्य पंढरीनाथ विरकर, सारिका वीरकर, वर्षा बनगर, वंदना गेजगे ,श्रीधरविरकर ,बाबुराव विरकर, यांसह पालक विद्यार्थी उपस्थित होते.