धामिॅक तेढ निर्माण होणाऱ्या घटना समाजामध्ये घडूच नये यासाठी सर्व समाजबांधवानी सतर्क राहवे.:तहसीलदार विकास अहिर
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड प्रतिनिधी –
धामिॅक तेढ निर्माण होणाऱ्या घटना समाजामध्ये घडूच नये यासाठी सर्व समाजबांधवानी सतर्क राहवे. तसेच असा एखादा कोणत्याही समाजातील माथेफिरु जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असेल त्याच्या बद्दलची माहिती पोलिस प्रशासनास तातडीने कळवण्याचे आवाहन ही यावेळी माणचे तहसीलदार विकास अहिर यांनी केले.
पुसेसावळीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक म्हसवड पोलीस स्टेशन येथे घेण्यात आली. यावेळी तहसीलदार विकास अहिर सपोनि राजकुमार भुजबळ माजी नगराध्यक्ष नितीन दोशी,अॅड निस्सार काझी युवराज सूर्यवंशी ,डॉं वसंत मासाळ,जय राजेमाने करण पोरे,नगरसेवक अकील काझी,किशोर सोनावणे ,शहाजी लोखंडे,नरळे, यांचेसह विविध पक्षांचे पदाधिकारी, तसेच सर्व समाजातील प्रमुख व्यक्ती यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना तहसीलदार विकास अहिर म्हणाले , सोशल मिडियावर धामिॅक भावना भडकवणारे चुकीचे मेसेज कोणीतरी ग्रुप वर पोस्ट करीत असतो त्या ग्रुप अॅडमिन ने सतर्कता राखत ताबडतोब डिलीट करावेत. आणि पोलिसांनी संपर्क करुन त्याबद्दल माहिती द्यावी.

यावेळी बोलताना सपोनि राजकुमार भुजबळ म्हणाले पुसेसावळी येथे झालेली घटना निंदनीय असून एखाद्याच्या चूकीची शिक्षा समाजाला भोगावी लागते हे दुदैवी असून समाजा समाजात बंधूभावाचे सौदाहर्याचे वातावरण टिकून राहण्यासाठी जेष्ठ मंडळींनी प्रयत्नशील राहणे काळाची गरज आहे. सोशल मिडिया पोस्ट करणाऱ्याना समाजाशी काही देणे घेणे नसते त्यामध्ये बहुतांशी अल्पवयीन मुले असतात. समाज्यातील जाणीव नसणाऱ्या मुलांना समज दिली त्याची वेळीच दखल घेतली तर पुढील प्रसंग टाळता येतील. सामाजिक बंधुभावाचे वातावरण शहरात दिसून येते चुकीचे काम करेल त्याला कायद्याने शिक्षा होणारच. सध्याचे वातावरण खराब असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. म्हसवड शहरात जातीय तेढ निर्माण होणारे असे प्रकार होऊ देणार नाही.जो कोणी चुकीचे वागेल तर खबरदार…असा इशारा ही यावेळी बोलताना दिला.
यावेळी शहरातील बहुसंख्य नागरिक प्रतिष्ठीत व्यक्ती यावेळी उपस्थित होते.
