महागाईचा महाराक्षस गाडा, शेतकऱ्यांना नवसंजिवनी द्या .* *आटपाडीच्या राष्ट्रवादीचे निवेदन .*
व्हिजन २४ तास न्यूज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला)
By: सादिक खाटिक
आटपाडी (प्रतिनिधी )
कोट्यावधी शेतकरी व भारतीयांना संपवायला निघालेल्या महागाई नावच्या महाराक्षसाचा तातडीने बंदोबस्त करा आणि विविध नैसर्गीक व कृत्रिम संकटाचा बळी ठरणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीचा हात द्या अशा मागणीचे निवेदन आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले .
राष्ट्रवादी काँग्रेसचे आटपाडी तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख, राष्ट्रवादीचे ज्येष्ट नेते रावसाहेबकाका पाटील, राष्ट्रवादीचे आटपाडी तालुक्याचे नेते भारततात्या पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक, ज्येष्ट नेते विष्णुपंत चव्हाण, आटपाडीचे माजी उपसरपंच विलासराव नांगरे पाटील, युवक राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सुरज पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ. अनिताताई पाटील, तालुका उपाध्यक्षा सौ अर्चनाताई जगताप, तालुका उपाध्यक्ष दत्ता यमगर, प्रभाकर नांगरे, आबासाहेब नांगरे, सोशल मिडीयाचे तालुका अध्यक्ष किशोर गायकवाड, युवक राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष रणजीत चव्हाण, प्रा .संताजी देशमुख, अतुल पाटील, परशुराम सरक, साहेबराव कदम, मुन्ना मुलाणी, जितेंद्र जाधव, मनोज भोसले, अतुल जावीर, रविंद्र लांडगे, नितीन डांगे, विशाल जाधव, अमित मोरे, विश्वनाथ सरगर ,गणेश नांगरे, मनोज नांगरे, धनाजी नांगरे, प्रशांत मोटे, सागर सोहनी, गणेश होनमाने,आशिष जाधव, विनोद बनसोडे, गिरीधर जावीर, शरद सोन्नुर, धुळाजी ठेंगले, इत्यादी मान्यवरांच्या सह्यांचे हे निवेदन नायब तहसीलदार श्री . शिंदे यांना देण्यात आले .
भारताच्या राष्ट्रपती मा. ना . द्रौपदीजी मुर्मू, देशाचे प्रधान सचिव, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा . शरद पवार साहेब, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, सांगलीचे जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले आहे .
भारतीयांच्या जीवनाला ग्रासलेल्या महागाईच्या समस्येने सध्या आक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे . २०१४ साली केंद्रस्थानी सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी साहेबांच्या उद्योगपती धार्जिण्या धोरणाने देशभर महागाईचा आगडोंब उसळला आहे . अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, मनोरंजन या भारतीयांच्या आवश्यक गरजा भोवती महागाईच्या आवळला गेलेल्या फासाने सामान्यांची स्थिती मरणासन्न झाली आहे . देशातल्या सर्वच बाजारात धान्य, खाद्य तेल, कडधान्ये, डाळी, फळे, दुध, अंडी, मटन, मासे, भाजीपाला, मसाले वगैरे जीवनाश्यक वस्तू पदार्थांनी महागाईचा उच्चांक गाठलाच आहे तथापि कोळसा, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकासाठीचा गॅस फक्त ८ वर्षात दुपटी तिपटीने महागल्याने कोट्यावधी भारतीयांचे बजेट पूर्णतः कोलमडले आहे . लाखो विद्यार्थ्याना महगाईने शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागत आहे . महागाईने पोषण आहार प्रचंड महागल्याने लाखो मुलां मुलींना कुपोषणाला सामोरे जावे लागत आहे . असे या निवेदनात स्पष्ट करून देशाचा मालक – राजा असणाऱ्या शेतकऱ्याला या प्रचंड महागाईने सळो की पिळो करून सोडले आहे . १८ – १८ तास मेहनत करणाऱ्या शेतकऱ्याला महागाईच्या प्रचंड दणक्याने प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागत आहे . महागाईने शेतीचे गणित बिघडलेल्या हजारो शेतकऱ्यांनी यापूर्वी आत्महत्या केलेल्या आहेत . भारतीय शेतकरी नेहमीच अनेक नैसर्गीक व कृत्रिम संकटाचा बळी ठरला आहे . या शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी केंद्र – राज्य शासनाने ठोस उपाययोजना केली पाहीजे . शेती फायदेशीर ठरण्यासाठी शेतकर्याला २४ तास मोफत वीज, मोफत पाणी, मोफत बी बीयाणे, गॅरंटीने हमी भाव देणारी व्यवस्था निर्माण करणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दीर्घ मुदतीचे बिनव्याजी १० लाखाचे कर्ज उपलब्ध करून दिले पाहीजे . देशातील कोणतीच गोष्ट सदयस्थितीत स्वस्त राहीली नाही . महागाईच्या या दुर्धर समस्येने समस्त भारतीय बंधू ,भगिनी, युवक, युवती, विद्यार्थी, विद्यार्थिनी, बालके, रुग्ण, वयोवृद्ध नागरीक हवालदिल आहेत . मानवी जीवनाला उपयोगी हजारो गोष्टीचा गत दहा वर्षाचा अभ्यास केल्यास महागाईने स्वातंत्र्या नंतरचा सर्वात मोठा उच्चांक गाठल्याचे दिसून येते . यावर डोळ्यावर पट्टी लावून वाटचाल करीत असलेल्या केंद्र आणि राज्यातल्या भाजपाई सरकारचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करतो, निषेध करतो . भारतीय न्याय व्यवस्थेनेच आता आपला तिसरा डोळा उघडून महागाईचा आणि त्याला कारणीभूत ठरणाऱ्या सत्तांध व्यवस्थेचा कडेलोट केला पाहीजे . सर्वच पातळीवर सुसुत्रता आणण्यासाठी पुढाकार घेतला पाहीजे . लाखो कोटींची कर्जे बुडवणारे, भ्रष्टाचारात आकंड बुडालेले, देशातल्या अनेक संस्था उध्वस्त करण्यासाठी प्रयत्न करणारे, महागाईला जबाबदार ठरणारे सर्वच भ्रष्टाचारी गजाआड करण्यासाठी न्याय व्यवस्थेनेच पाऊले उचलली पाहिजेत . देशातील सर्वच वस्तू, पदार्थ वगैरे हजारो बाबी वरची महागाई तातडीने आटोक्यात आणून प्रत्येक भारतीयाला समाधानाने जीवन जगण्याचा मार्ग काढून दिला पाहीजे . याच भूमिकेतून आम्ही आपणांस निवेदन देत आहोत . असे शेवटी म्हटले आहे