बिजवडी गावात पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरु करा: सरपंच योगेश भोसले
व्हिजन २४ तास न्यूज म्हसवड
By;दौलत नाईक
दहिवडी/प्रतिनिधी:
माण तालुक्यातील उत्तर भागातील बिजवडी गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनाने टंचाई घोषित करून त्वरित पाण्याचा टँकर सुरु करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन सरपंच योगेश भोसले यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सातारा यांना दिले आहे*.
निवेदनात म्हटले आहे, बिजवडी गाव परिसरात उन्हाळ्याच्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यातच पाणी टंचाई निर्माण होऊन पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरु करावा लागतो. यावर्षीही फेब्रुवारी महिन्यात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. अपानी टंचाईच्या पार्श्वभूमीवर टँकर सुरु करणेबाबत प्रस्ताव सादर केला आहे. परंतु टंचाई जाहीर करण्यात आली नसल्याने प्रशासनाच्या वतीने अद्याप टँकर सुरु करण्यात आलेला नाही. त्यामुळे बिजवडीत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
तरी शासनाने टंचाई घोषित करून तातडीने बिजवडी गावाला पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरु करून नागरिकांची गैरसोय दूर करावी. तसेच बिजवडी गावाला सार्वजनिक पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीजवळ केटी बंधारा करण्यात यावा .तो बंधारा झाल्यास भविष्यात भूजल पातळीत वाढ होईल व पाणी टंचाई भासणार नाही. या विषयांच्या अनुशंघाने त्वरित कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी बिजवडी ग्रामस्थांच्यावतीने सरपंच योगेश भोसले यांनी केली आहे.