माणदेशी मुंबईकरांचा निर्धार: अरविंद पिसे यांच्या पाठिशी ठाम उभे

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

म्हसवड, दि. ९ (प्रतिनिधी) –

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माण – खटावमधील राजकीय वातावरण तापले असतानाच, मुंबईस्थित माणदेशी जनतेने अरविंद पिसे यांच्या उमेदवारीला जोरदार पाठिंबा दिला आहे. मुंबईकर माणदेशी जनतेने त्यांच्या साधेपणाला, प्रामाणिकपणाला आणि पाण्याच्या प्रश्नावरील गाढ्या अभ्यासाला प्रतिसाद देत, त्यांना एक योग्य उमेदवार मानण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

मुंबईतील एका संवाद कार्यक्रमात माणदेशी जनतेने आपली भूमिका स्पष्ट केली. “चंदेरी मुंबईला चमकोगिरीची ओळख आहे, पण आम्हाला भपकेबाज उमेदवार नको आहेत. आम्ही साधेपण आणि प्रामाणिकपणाला महत्त्व देतो. अरविंद पिसे हे अशा गुणांनी परिपूर्ण असल्याने यंदा त्यांनाच आमचे समर्थन आहे,” असे मुंबईस्थित माणदेशी जनता म्हणाली.

पेशाने सिव्हिल इंजिनियर असलेले पिसे गेल्या सात वर्षांपासून माण-खटावमधील सामाजिक प्रश्नांवर काम करत आहेत. दिव्यांग, वृद्ध नागरिक, निराधार महिलांसाठी त्यांनी उभारलेला लढा आणि पाण्याच्या प्रश्नावर त्यांचा गाढ अभ्यास यामुळेच ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. विशेष म्हणजे, मुंबईत राहणाऱ्या माणदेशी जनतेला त्यांच्या कामाची पूर्ण कल्पना असल्याने, त्यांनीही पिसे यांच्या उमेदवारीचे स्वागत केले आहे.

“माण-खटावमधील पाणी प्रश्न गंभीर आहे. निवडणुका आल्या की तो प्रश्न ऐरणीवर येतो, पण त्यावर अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. पिसे यांचा पाण्याच्या प्रश्नावरचा अभ्यास आणि त्यावरील उपाययोजना अमलात आणल्या तर हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवता येईल, याची आम्हाला खात्री आहे,” असे मुंबईतील माणदेशी नागरिकांनी सांगितले.

महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नसली, तरी प्रहार जनशक्ति पक्षाने अरविंद पिसे यांची उमेदवारी जाहीर करत, निवडणुकीत एक नवा चेहरा दिला आहे. “चमकोगिरीला भुलणार नाही, साधेपण आणि प्रामाणिकपणालाच आमचा कौल,” असा ठाम निर्धार मुंबईतील माणदेशी जनतेने व्यक्त केला आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!