आगामी लोकसभा निवडणुक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस पाटील यांनी गावात सतर्क राहावे :सपोनि बिराजदार

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड: प्रतिनिधी
        पोलीस पाटील हा गाव पातळीवरील प्रशासनाचा मुख्य घटक असल्याने आगामी लोकसभा निवडणुक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस पाटील यांनी गावात सतर्क राहावे असे आवाहन सपोनि सखाराम बिराजदार यांनी केले

      म्हसवड ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांनी पोलीस ठाण्याचा चार्ज स्वीकारल्यानंतर तातडीने पोलीस पाटील यांची म्हसवड पोलीस ठाण्यामध्ये बैठक आयोजित केली होती यावेळी ते पोलीस पाटील यांना मार्गदर्शन करताना बोलत होते यावेळी पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे गोपनीय विभागाचे अभिजीत भादुले उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना सपोनि बिराजदार म्हणाले पोलीस पाटील हा गावातील प्रशासनाचा महत्त्वाचा घटक आहे महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन आणि गाव यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करत असतो सध्या देशात लोकसभा निवडणुका होत आहेत.
लोकसभा निवडणुकी संदर्भ मध्ये गावात आतापासूनच निवडणुकीचे वातावरण तयार होत आहे लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागल्यापासून ते निवडणुका संपेपर्यंत पोलीस पाटील यांनी गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दक्ष राहून काम करण्याची गरज आहे
म्हसवड पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या सर्व गावातील पोलीस पाटील हे अतिशय सक्षम पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहेत तरीही निवडणुकीच्या काळात त्यांनी अधिक सक्षमपणे गावातील हालचालींवर व अवैद्य व्यावसायिकांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे गावात जर तशी कायदा सुव्यवस्थे संदर्भात काही परिस्थिती उदभवणार असेल तर लगेचच स्वतः मला किंवा पोलीस स्टेशनशी संपर्क साधून पोलीस पाटलांनी माहिती द्यावी व गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन सपोनि सखाराम बिराजदार यांनी या वेळी केले.
या बैठकीस म्हसवड विभागातील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.या वेळी पोलीस पाटील संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष शहाजी बनगर पाटील यांनी सपोनि सखाराम बिराजदार यांचा सत्कार करण्यात आला.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!