कुटुंबाची परिस्थिती सुधारायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही: अश्विनी शेंडगे
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक अहमद मुल्ला )
हिंगणी वार्ताहर
कुटुंबाची परिस्थिती सुधारायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन माण खटाव च्या डी. वाय. एस. पी. अश्विनी शेंडगे यांनी म्हसवड येथे कार्यक्रमात केले.
नुकतेच” उमेद एक आस ‘या संस्थेच्या वतीने विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेल्या मुलांच्या गुणगौरव कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष सुरेश म्हेत्रे, माजी नगराध्यक्ष विजय धट, युवा उद्योजक करण सिन्हा, पोलीस उपनिरीक्षक विजय पिसे ,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शेंडगे पुढे म्हणाल्या की, उमेद चांगल्या विचारांची असावी,चांगल्या संस्काराची असावी . नकारात्मक लोकांची संख्या भरपूर आहे परंतु सकारात्मक विचार गरजेचा आहे. समाजात भरपूर आयडॉल असतात. भंडारा जिल्ह्यात काम करता ना अनेक आवाहने होती. आवाहनावर मात करून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले .आई वडिलांनी मुलांच्या भविष्यासाठी कष्ट घ्यावे , शाळा,शिक्षनाच्या माध्यमातून प्रगती झाली. आज चांगले शिक्षण व चांगल्या संस्काराची गरज आहे. महात्मा जोतिबा फुले यांचे विद्यविना मती गेली,मतिविना नीति गेली ,नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले, वित्त विना शुद्र खचले,इतके अनर्थ एका अविद्येने केले असे सांगून समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले असे सांगून आपल्या मुलांना मोबाईल व अन्य व्यसनापासून मुलांना दूर ठेवा असे आवाहन केले. करण सिन्हा यांनी सांगितले की,माण तालुक्यातील मुलांसाठी कार्य करण्याची प्रेरणा आईकडून मिळाली . शिक्षण विस्तार अधिकारी संगीता गायकवाड यांनी आम्ही मध्यम परिस्थिती त शिक्षण घेऊन यश मिळवले त्याप्रमाणे विजयने खडतर परिस्थितीत शिक्षण घेऊन यश मिळवले. यश मिळण्यासाठी चिकाटी व संयम आवश्यक आहे.उमेद एक आस या संस्थेने पर्यावरण व शिक्षण यामध्ये कार्य करून तरुण मुलांना प्रेरणा द्यावी असे सांगितले. पोलीस महानिरीक्षक झालेलले विजय पिसे यांनी स्वतःच्या गरिबी तील शिक्षणाची जीवन कहाणी सांगून मुलांना शिक्षणासाठी पैसा महत्त्वाचा नसून इच्छा शक्ती महत्वाची असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात गरीब होतकरू मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. जिल्हा परिषद शाळेतील शिष्यवृत्ती धारक मुलांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचें सूत्रसंचालन महेश सोनवले यांनी केले व आभार प्रथमेश उबाळे यांनी मानले.