वाढत्या महागाई आणि बेरोजगारी विरोधात माण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा भव्य मोर्चा
व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
महागाई कमी झालीच पाहिजे, वाढत्या गँस सिलेंडर चा दर कमी झालाच पाहिजे मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार चा जाहिर निषेध, जाहिर निषेध असा जयघोष करीत म्हसवड शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडुन निषेध रँली काढुन महागाई व बेरोजगारी विरोधात आंदोलन करीत येथील तलाठी आखडमल यांना निवेदन देण्यात आले.
केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज राज्यात महागाईने हाहाकार उडाला आहे, याशिवाय लाखो तरुण बेरोजगार झाले आहे याचा निषेध म्हणुन राष्ट्रवादी पक्षाने माण-खटाव राष्ट्रवादी चे नेते प्रभाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चाचे आयोजन केले होते, म्हसवड चे ग्रामदैवत असलेल्या श्री. सिद्धनाथ मंदिरापासून मोर्चाला सुरुवात होउन मोदी व शिंदे सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत मंडलअधिकारी कार्यालयासमोर गावकामगार तलाठी उत्तम अकडमल यांना निवेदन देण्यात आले यावेळी किशोर सोनवणे, प्रा.कविता म्हेत्रे, परेश व्होरा, पृथ्वीराज राजेमाने, तेजसिंह राजेमाने, युवराज सुर्यवंशी, राजकुमार भोसले, राष्ट्रीय कॉंग्रेस चे माण तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने, प्रा. विश्वंभर बाबर, बाळासाहेब माने, राजकुमार डोंबे, विकास गोंजारी, बाबासाहेब माने, आदी राष्ट्रवादी कॉग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. सिध्दनाथ मंदिरापासुन सुरु झालेला हा निषेध मोर्चा येथील म. फुले चौकात येताच सदर मोर्चाचे छोटेखानी सभेत रुपांतर झाले, यावेळी मोर्चाला संबोधित करताना राष्ट्रवादीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनवणे म्हणाले की महागाईने सामान्य जनतेला जगणे मुश्किल झाले आहे याला सर्वस्वी केंद्र व राज्य सरकार जबाबदार असल्याने या सरकार चा निषेध करत आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने म्हसवड येथील मंडलाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला या मोर्चाद्वारे आम्ही सरकारचा निषेध करत आहोत. या सरकार ला सामान्य जनतेशी काहीही देण – घेण नाही त्यामुळे सामान्य जनतेच्या व्यथा काय आहेत हे या राज्यकर्त्यांना समजत नाही मुळातच हे सरकार संवेदनशील नाही त्यामुळे सर्वसामान्यांना दैनंदिन लागणाऱ्या सर्व वस्तुंचे, खाद्यतेलांचे व गँस सिलेंडर चे दर आज गगणाले भिडले आहेत, या भाववाढीमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले मोदी आणी शिंदे सरकार राज्याचे व देशाचे वाटोळे करायला निघाले आहे. पेट्रोल डिझेलचे दर तीपटीने वाढले पण त्यावर सरकार बोलायला तयार नाही मोदी शिंदे सरकारला सत्तेची मस्ती आली आहे छ.शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचा अपमान करणाऱ्यांना हे सरकार पाठीशी घालत आहे आणी महागाई वरुन लोकांची मने विचलीत करीत आहे. अर्थसंकल्पात गरीब विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती, दलीत उद्योजकांचा प्रोत्साहन निधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक निधी कमी केला आहे, आपण केलेले सर्व पाप झाकून टाकण्यासाठी राहुल गांधीवर खोटे नाटे आरोप करुन त्यांची खासदारकी रद्द करुन लोकांची मने मुख्य मुद्यावरुन विचलीत करायचे काम हे शिंदे व मोदी सरकार करीत आहे या निर्लज्ज सरकारच्या धोरणावर वारंवार अशी तिव्र आंदोलने करावी लागतील आणी या सरकारला खाली खेचावेच लागेल आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने या सरकारचा जाहीर निषेध करत असल्याचे शेवटी किशोर सोनवणे यांनी सांगीतले.

यावेळी बोलताना राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा प्रा कविता म्हेत्रे म्हणाल्या हे मिंदे सरकार एवढी महागाई वाढली असताना गप्प बसत आहे मोदी व शिंदे सरकार महागाई वाढवून जनतेला चुना लावायचे काम करत आहे मोदीजी तुम्ही वर्षाला दोन कोटी तरुणांना नोकऱ्या देणार होता ८ वर्षात किती तरुणांना नोकऱ्या मिळाल्या अनेक कंपण्या बंद करुन तरुणांना बेरोजगार केले. आणी आता तर कंत्राटी पद्धतीने नोकऱ्या पद्धत आणली आहे. मिंधे सरकारने महिलांना अर्ध्या तिकीटात एस.टी. प्रवास योजना आणली आम्हाला अर्धे तिकीट नको गॅसचे दर अर्धे करा मोदीजी तुमची डिग्री खरी की खोटी तुम्ही पास आहात की नापास याच्याशी सामान्यांचे काही देणं घेणं नाही सामान्य जनता महागाईने होरपळत आहे आणी हिच जनता मोदी आणी मिंधे सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस दिलीप तुपे, सामाजिक कार्यकर्ते राजकुमार डोंबे, राष्ट्रीय कॉंग्रेस चे प्रा. विश्वंभर बाबर यासह अनेक वक्त्यांनी यावेळी बोलताना केंद्र व राज्य सरकार चा निषेध करीत सर्वसामान्य जनतेने यापुढे या सरकारला धडा शिकवण्यासाठी यांना यापुढे कोणत्याच निवडणुकीत निवडुन देवु नये असे आवाहन केले. यावेळी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.