संत नामदेव शिंपी समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार ; इंजि .सुनील पोरे
व्हिजन २४ तास न्यूज
BY;Ahmad Mulla
म्हसवड ;
संत नामदेव समाज उन्नती परीषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिंपी समाजाला एकत्र करुन त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थीक समस्या दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन नासप चे जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुनील पोरे यांनी केले
संत नामदेव समाज उन्नती परिषदेच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर इंजि सुनील पोरे यांनी जिल्हाभर दौरे काढून शिंपी समाजाचे मेळावे घेऊन समाजाच्या समस्या जाणून त्यांना एकत्रीत करण्याच्या अभियानाला सुरुवात केली
याच दरम्यान तारळे ता पाटण या गावात संत शिरोमनी नामदेव शिंपी समाज मंदिरात घेतलेल्या शिंपी समाज बांधवाच्या मेळाव्यात इंजि . सुनील पोरे बोलत होते ते पुढे म्हणाले शिंपी समाज अजूनही सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या खुप मागासलेला आहे शासनाच्या सवलती पासून वंचित आहे जुन्या रुढी परंपराचा पगडा आहे हा समाज जिल्ह्यात विखुरलेला असुन त्याची गणती कधीच झाली नाही त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत काही ठिकाणी असणाऱ्या शिंपी समाजात अंतर्गत वाद विवाद आहेत ते सर्व दूर करुन समाजाला एकत्र करण्याचे काम आपल्या सगळ्याच्या सहकार्याने करायचे आहे

आपल्या मानसाला आपणच किंमत द्यायची आहे इतर समाजात पहा ते आपल्या समाजातील एखादी व्यक्ती, कुटुंब आर्थीक विवंचनेत असेल, त्याची परिस्थीती खालावलेली असेल तर त्वरीत त्याला मदत करुन त्याला सावरायला मदत करतात मग आपण तसे का करू नये? आपला शिंपी समाज बांधव जिल्ह्यात किती आहे याची गणती अजून कोणी केली नाही जिल्ह्यात शिंपी समाज विखुरला आहे त्याला एकत्र आणण्याचे काम आज आपण सर्वांनी करण्याची गरज निर्माण झाली आहे आपल्या समाजातील अनेक जण चांगल्या पदावर कार्यरत आहेत त्यांचीही मदत घेऊ या शिंपी समाजात अनेक समस्या आहेत शैक्षणिक, आर्थीक, सामाजिक समस्या सोडवण्यासाठी आपली एकी आवश्यक आहे. समाजात आपआपसात असणाच्या समस्या भांडण वाद हे बाजूला करून आपण आपली ताकत दाखवण्याची वेळ आली आहे . आपल्या मधील सामाजिक मागासलेपणा दूर करून मुलांमुलीना – चांगले शिक्षण मुलांना नोकरीची संधी या करीता प्रयत्न करण्याची गरज आहे
यासाठी आपल्या सर्वांची साथ आवश्यक असल्याचे शेवटी पोरे यांनी सांगीतले
यावेळी प्रदीप पोरे मायणी, सर्पमित्र विजय बारटक्के, सदाशिव खांडके, विश्र्वास खांडके, शिवदास खांडके,वनारसे, भस्मे, बेंद्रे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.