रावसाहेब पाटील यांच्या रुपाने राष्ट्रवादीने आटपाडीला न्याय द्यावा.* *सादिक खाटीक .*

बातमी Share करा:

व्हिजन  २४ तास  न्यूज
आटपाडी दि .१७ (प्रतिनिधी )
                स्वर्गीय राजारामबापूंना दैवत मानून गत पाच दशके या मतदार संघात बापू आणि त्यांच्या पश्चात आमदार जयंतराव पाटील साहेबांच्यावर प्रेम करणारे रावसाहेबकाका पाटील यांच्या सारखे उपेक्षित नेतृत्व आमदार बनल्यास बापू आणि साहेबांच्या विचारांचा खरा विजय होईल. असे उदगार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक यांनी येथे बोलताना काढले .
               राजारामबापू हायस्कुल आणि ज्यूनियर कॉलेज आटपाडी येथे लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या ३९ व्या पुण्यतिथी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सादिक खाटीक बोलत होते . अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे ज्येष्ट नेते श्री . भवानी शिक्षण संस्थेचे चेअरमन रावसाहेबकाका पाटील हे होते .
                दुष्काळी तालुक्यांना कृष्णेचे पाणी मिळावे यासाठी मोठा संघर्ष करणाऱ्या राजारामबापू पाटील यांच्यामुळेच प्रत्येक राज्यकर्त्याला हे पाणी दुष्काळी भागाला देण्याचा ध्यास लागला . आणखी २५ वर्षाचे आयुष्य बापूंना लाभले असते तर सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इंच अन् इंच जमीन ओलीताखाली आली असती . बापूंचे अपूरे स्वप्न पूर्णत्वास नेताना आमदार जयंतराव पाटील यांनी आपली सगळी कारकीर्द पणाला लावल्याने दुष्काळी भागात कृष्णामाई अवतरली आहे . दुष्काळी भागात अवतरलेल्या कृष्णेच्या पाण्याचे खरे भगिरथ राजारामबापू आणि जयंतराव पाटील हेच आहेत असे स्पष्ट करून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ट नेते श्री .भवानी शिक्षण संस्थेचे चेअरमन रावसाहेबकाका पाटील यांनी, जनतेची सुख – दु:खे अजमावत, जनतेशी सुसंवाद साधताना हजारो किलोमीटरची पायपीट करणारे पदयात्री राजारामबापू पाटील हे दुसरे विनोबा भावेच होते, असा गौरवपूर्ण उल्लेख रावसाहेबकाका पाटील यांनी केला .
                नेतृत्वाची एक पीढी घडविणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला विधायक दिशा देणाऱ्या स्व . राजारामबापू पाटील आणि आमदार जयंतराव पाटील यांचे विचाराने वाटचाल करणारेच उद्याच्या महाराष्ट्राचे राजकर्ते बनतील. असा विश्वास व्यक्त करून सादिक खाटीक यांनी, विधानसभेच्या १४ निवडणूकात फक्त २ वेळाच आटपाडी तालुकावाशीय आमदार झाले. वास्तवीक आटपाडी तालुक्याची सतत उपेक्षाच झाली आहे . येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसने रावसाहेबकाका पाटील यांच्या रुपाने आटपाडी तालुक्याला उमेदवारी दिली पाहीजे . मुख्यमंत्री जयंतराव पाटील आणि आमदार रावसाहेबकाका पाटील हे भविष्यातील स्वप्न सत्यात यावे यासाठी यापुढच्या काळात मी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असल्याचे सादिक खाटीक यांनी स्पष्ट केले .
                कृष्णेचे पाणी दुष्काळी भागाला मिळावे हे राजारामबापुंचे स्वप्न होते  आणि ते पुर्णत्वास नेण्याचे काम जयंतराव पाटील यांनी केले . बापूंच्या जीवन कार्याचा आढावा घेवून सादिक खाटीक यांनी, माझ्या जीवनाला आकार देण्यात राजारामबापू हायस्कुलचा मोठा वाटा आहे . बापूंचे आणि जयंतराव साहेबांचे आपणास लाभलेले आशीर्वाद जीवन कृतार्थ करणारे ठरले . उर्वरीत आयुष्यात हेच दैवी आशिर्वाद आपल्या पाठीशी सदैव रहावेत हीच नम्र अपेक्षा राहणार असल्याचे ही शेवटी सादिक खाटीक यांनी सांगितले .
                प्रारंभी दादासाहेब मोटे सर यांनी स्वागत व प्रास्तावीक करताना राजारामबापू पाटील आणि जयंतराव पाटील यांच्या कार्याचा जीवनपट उलघडून दाखविला .
                श्रावणी नामदास, वैष्णवी पाटील, प्रज्वल जाधव, निर्भय खंदारे, मनिषा मिसाळ, प्रणिता गिरी, संस्कृती तळे, सानिका गिड्डे, अंकिता गायकवाड, रोहीणी शिंदे, दिपाली पवार, श्रेयस कुटे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले . यावेळी प्रशालेचे मुख्याध्याक टी . डी . चव्हाण सर, एस. एल . पाटील सर, एस. एम . पाटील सर, एम . बी . देवकर, एम .आय . साळुंखे, ए. ए . जाधव, आय . जी . मुलाणी, एम . एस . कोरवी मॅडम, एस. एस . भोसले मॅडम , माजी विद्यार्थी श्रीनिवास सपाटे व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते . शेवटी आभार ए. ए . जाधव सर यांनी मानले .

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!