माण तालुक्यातील आठ गावांमध्ये जमावबंदी आदेश लागू : कालवा पाणी पळवण्याच्या घटनांमुळे कारवाई

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड प्रतिनिधी :
माण तालुक्यातील वळई, जांभुळणी, पुळकोटी, गंगोती, पानवन, देवापूर, पळसावडे आणि शिरताव या गावांमध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. कालव्यावरील पाणी पळवण्याच्या घटनांमुळे पाणी नियोजन बिघडत असल्याने आणि शासकीय मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेता हा आदेश उपविभागीय दंडाधिकारी माण-खटाव यांनी जारी केला आहे.

तारळी प्रकल्पांतर्गत माण वाढीव कालवा व अंत्यवितरक कालव्यांमध्ये सुरू असलेल्या पाणी आवर्तनादरम्यान काही गावांमध्ये दरवर्षी वारंवार दारे उघडून पाणी पळवण्याचे प्रकार घडत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ (२) अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.

हा आदेश दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजीच्या मध्यरात्रीपासून लागू होणार असून, पाणी आवर्तनाचा कालावधी संपेपर्यंत तो प्रभावी राहणार आहे. आदेशानुसार, या गावांमध्ये एका ठिकाणी पाच किंवा अधिक लोकांची गर्दी करता येणार नाही. मात्र, शासकीय अधिकारी, वाहनचालक आणि शासनाने अधिकृतपणे नेमलेले कर्मचारी यांना यामधून वगळण्यात आले आहे.

तसेच, गोंदवले खुर्द, मणकर्णवाडी, पळशी या गावांमध्ये होणाऱ्या धार्मिक, विवाह व अंत्यसंस्कार संबंधित कार्यक्रमांवर याचा परिणाम होणार नाही. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे उपविभागीय दंडाधिकारी उज्वला गाडेकर यांनी स्पष्ट केले आहे.

या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी दहिवडी व म्हसवड पोलीस ठाण्यांना योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित भागांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची उपस्थिती सुनिश्चित करण्यात येणार आहे.

उपविभागीय दंडाधिकारी उज्वला गाडेकर यांनी दिलेल्या आदेशानुसार, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेनुसार कठोर कारवाई करण्यात येईल. सदर आदेशाची माहिती संबंधित गावांमध्ये योग्य पद्धतीने प्रसारित करण्यात येणार आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!