ग्रामविकास व पंचायत राज कॅबिनेट मंत्री पदी जयकुमार गोरे यांची निवड म्हसवडकरांच्या वतीने नागरी सत्कार

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला)
म्हसवड

येथील जनतेने मला निर्णायक मते दिली असून यावेळी मला म्हसवड येथील मतदारांनी साडेसहा हजार मतांचे लिड दिले आहे. मी येथील जनतेला व माण तालुक्यातील मातीला कधीच विसरणार नाही, आगामी काळात माण खटाव तालुक्याचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आहे. यापुढील काळात औद्योगिक वसाहत, शाळा,काॅलेज, वैद्यकीय महाविद्यालय, सर्व सोयींनी युक्त सुसज्ज हॉस्पिटल उभा करुन सामान्य माणसाला हाताला काम देण्याच्या साठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार जयकुमार गोरे यांनी म्हसवड येथे आयोजित भव्यदिव्य नागरी सत्कार कार्यक्रम प्रसंगी बोलताना सांगितले.

म्हसवड येथील नगरपालिका बाजार पटांगण येथे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा भव्य नागरी सत्कार म्हसवड येथील कार्यकर्त्यांनी आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते.
यावेळी विरोधकांचा खरपूस समाचार ही त्यांनी घेतला. दरवेळी विरोधकांनी मला खोटं आरोप करून अडचणीत आणले पण मी त्यांचेवर मात केली , आता यापुढे त्यांना आता सोडणार नाही. मला विरोध करणारांची दयनीय अवस्था झाली आहे. असे सांगून ते म्हणाले, हिंगणी गावात पाणी आणू नये यासाठी विरोध करणारे, व पाण्याच्या पाईप मध्ये वाळुची पोती, दगडे टाकून पाणी आडवणारे महा नालायक , सर्वात अगोदर माझा सत्कार करायला नागपुरात आले. शेलक्या शब्दात त्याचा समाचार ही त्यांनी घेतला.दर वेळी मी दुर्लक्ष केले. पण आता मी यांना सोडणार नाही.. असे ही ते म्हणाले.

यावेळी माजी आमदार दिलीपराव येळगावकर, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, विजय धट, नितीन दोशी, सुरेश म्हेत्रे, अरुण गोरे, संजय गांधी आप्पासाहेब पुकळे, शिवाजीराव शिंदे,इंजि. सुनिल पोरे, युवराज सुर्यवंशी, धनश्री देवी राजे माने, शंकर विरकर, डॉ प्रमोद गावडे, अकिल काझी, डॉ वसंत मासाळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते

आपल्या सत्काराला उत्तर देताना जयकुमार गोरे पुढे म्हणाले, म्हसवड ला आल्यावर आपल्या माणसात आपल्या घरात आल्यासारखे वाटते. मी चार वेळा आमदार झालो आणि म्हसवड करांनी निर्णायक भरभरून मतदान केले मला म्हसवड करांनी जवळ जवळ सहा हजाराचे लीड दिले सुरवातीला माझ्या सर्वेचा रिपोर्ट निगेटिव्ह होता पण २५ वर्ष सर्व्ह करणाऱ्या कंपणीचा देखील अंदाज म्हसवड करांनी चुकीचा ठरवला तुम्हा सर्वांचे धन्यवाद देताना पार्टीला सुद्धा धन्यवाद दिला पाहिजे पार्टीने कायम माझा सन्माननीय केला ज्यांची मी शिफारस केली त्याठिकाणी सुद्धा माझं ऐकण्याचे काम केलं देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार आले माण खटाव च्या मातीचा दुष्काळ मिटवायचा दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी माण खटावचा दुष्काळी कलंक पुसण्यासाठी भाजपात गेलो आणि या जयकुमार गोरेनी जेव्हा जेव्हा शब्द टाकला तो आजपर्यंत माझ्या कोणत्याही शब्दाला नाही म्हटलं नाही मला कधीही नाराज केले नाही लोकसभेच्या निवडणुकीनंतर एक वेगळे वातावरण तयार झाले आणि आता भाजप संपला त्याची सत्ता येत नाही असे सगळीकडे पसरवले गेले पण झोपलेल्या वाघाला जाळे टाकले सोपे असते उठलेल्या वाघावर जाळे टाकने सोपे नसते त्याप्रमाणे महायुती सावध झाली होती पाठीमागे झालेल्या सगळ्या चुका बाजूला केल्या आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस आदरणीय एकनाथ शिंदे साहेब या सगळ्यांनी या जनतेच्या हिताचे सरकार दोन अडीच वर्षे चालवले अनेक कामे मंजूर करून पूर्णतवास नेहली महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाचा विचार करुन विविध योजना आणल्या आणि विरोधकांच्या दुकानांना फडणीवीसांनी कुलपे लावली .शेतकरी, बांधकाम कामगारांना, समाजातील सर्व घटकांनाआ. मोदी सरकारने न्याय दिला लाडकी बहीण योजना चालू केली त्यात बहिणींना आता एकवीसशे रुपये मिळतील प्रत्येक समाजाचा विचार मोदी सरकार व फडणवीस सरकारने करून त्यांच्या हिताचे निर्णय घेतले. त्यामुळेच सरकार एवढ्या मोठया फरकाने आले.लोकांच्यात भांडणे फक्त लावायचे काम विरोधकांनी केली आजच्या निकालाने दाखवून दिले आहे कसलाही नरेटिव्ह चालणार नाही लोकांची सर्व सामान्यांची कामे करणारे सरकार सत्तेत येणार आहेत
याच पवारांनी बघा भोसले,मुंडे,गोरे यांची अनेकांची घरे फोडली आता काळाचा महिमा बघा आता भोसले एकत्र झाले मुंडे एकत्र झाले गोरे एकत्र झाले आणि पवारांचे घर फुटले माझ्यावर प्रत्येक निवडणुकीत खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न झाला पण हा रेशनींग दुकानदाराचा मुलगा चौथ्या वेळी देखील निवडून आला चार वेळा आमदार झालो आता नुसता आमदार नाही मंत्री सुद्धा झालो परमेश्वराने जे जिवन दिले ते माण खटावच्या मातीसाठी दिले आहे. महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारे नेतृत्व आपल्या महाराष्ट्राला मिळाले असून माण तालुक्याचे मी मंत्री होईल असे कुणाला वाटले होते? पण मी माझ्या नेतृत्वाला मंत्री करा म्हणून गेलो नाही त्यांनी माझ्या मातीचा माण खटाव घ्या मातीचा जनतेचा सन्मान केला आहे
“माझ्या मंत्रिपदाच्या निवडीमुळे माण-खटावच्या मातीचा सन्मान झाला आहे. माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करीन. महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा विकास हे माझे प्रमुख ध्येय आहे. भाजपने मला दिलेली जबाबदारी पार पाडताना, शेतकरी, बांधकाम कामगार आणि समाजातील सर्व घटकांसाठी काम करणार आहे.”

“म्हसवडकरांनी माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी झटणार आहे. माण-खटावच्या प्रत्येक विकासकामासाठी निधी आणण्यासाठी प्रयत्नशील राहीन,” असे ते म्हणाले.

जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले की, “आता विकासाची गती वाढवून, ग्रामीण भागाला प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणणे हे माझे उद्दिष्ट आहे. माझी माती आणि माझे लोक यांच्यासाठी मी शेवटपर्यंत लढत राहीन.,जगातील कुठलीही जबाबदारी आली तर माण खटावला विसरणार नाही .माण खटाव येथील जनतेसाठी मी सतत भाऊ आहे.

भाऊ हे नाते शेवट पर्यंत राहणार जो जो शब्द दिला आहे . माण खटाव तालुक्यातील जनतेला आर्थिक सक्षम होई पर्यंत प्राणपणाने लढणार आहे .
भारतीय जनता पार्टी व पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी सदैव ऋणी आहे यापुढे मी माण खटाव घ्या मातीचा जनतेला विसणार नाही आता कामात कुठे कमी पडणार नाही.अजून खूप काम करायचे आहे.विरोकाबाबत ते म्हणाले,
मी आता ठरवलंय . आता कुणालाही माफी नाही.विरोधकांचा आता सगळ्यांचा सुपडा साफ करायचा. जो गोरे च्या नादाला लागलाय त्याचा कार्यक्रम झाला च म्हणून समजा.. आणि आता
तो देवानेच कार्यक्रम केला आहे. ..

माजी आमदार दिलीपराव येळगावकर यावेळी बोलताना म्हणाले,
जयकुमार गोरे यांना यापुढे आता कायम आमदार नाही तर कायम नामदार राहणार आहेत,त्यांचेवर आता महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा विकास करण्याची जबाबदारी आहे.
जयाभाऊ महाराष्ट्राचा नाही तर देशाचा निधी आणून सर्व सामान्यांना न्याय देतील असे ही ते म्हणाले….


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!