शामगावच्या पाणी प्रश्नावर आठवड्यात बैठक – आमदार सदाभाऊ खोत

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

कुलदीप मोहिते,
कराड, – प्रतिनिधी

विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाल्यानंतर सदुभाऊ खोत यांनी कराड तालुक्यात दौरा केला. या दौऱ्यात ओगलेवाडी आणि शामगाव येथे त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना सदुभाऊ खोत यांनी शामगावच्या पाणी प्रश्नावर लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

खोत म्हणाले, “शामगावचा पाणी प्रश्न अत्यंत गंभीर आहे आणि हा प्रश्न सकारात्मक दिशेने जाणारा आहे. योग्य मागणी असल्यास शासनाच्या पाठिंब्याने हा प्रश्न सोडवला जाईल. आम्ही चळवळीतील लोक आहोत, आम्हाला लढायचं माहित आहे, रडायचं नाही.” यावेळी त्यांनी शासनाची भूमिका सकारात्मक असल्याचे सांगत, हा प्रश्न लवकरच सुटेल असा विश्वास व्यक्त केला.

शेतकरी संघटनेचे सचिन नलावडे यांनी उन्हाळ्यातील दुष्काळी परिस्थितीवर प्रकाश टाकत पाणी प्रश्न किती गंभीर आहे, हे स्पष्ट केले. किसान मोर्चाचे सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांनी मागील ४० वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असल्याची खंत व्यक्त केली आणि आता लोकप्रतिनिधींनी या प्रश्नावर एकजूट दाखवून लढा द्यावा अशी मागणी केली.

कार्यक्रमात उपस्थित असलेल्या अन्य मान्यवरांमध्ये शिवाजी पाटील, मनोज घोरपडे, जय रामस्वामी, अनिकेत साळुंखे, अजय सूर्यवंशी, सरपंच विजय पाटोळे आदींचा समावेश होता. मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

शामगावचा पाणी प्रश्न लवकरच सुटेल, असा विश्वास या कार्यक्रमानंतर परिसरात चर्चेत आला आहे, विशेषतः आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा अधिक महत्त्वाचा ठरणार आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!