माण-खटावची इंच न इंच जमीन आपण जोवर ओलीताखाली आणत नाही तोवर स्वस्थ बसणार नाही : आ. जयकुमार गोरे यांनी केले.

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
      माणच्या माथी दुष्काळी हा जो कलंक लागला आहे तो कलंक केवळ येथील यापुर्वीच्या राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे लागला आहे, पृथ्वी च्या अस्तापर्यंत याठिकाणी पाणी येवु शकत नाही असे म्हणणार्या राष्ट्रीय नेत्यांनासुध्दा दुष्काळाचा हा कलंक पुसावा वाटला नाही मात्र हा जयकुमार गोरे या सर्वांपेक्षा वेगळा आहे, आणी म्हणुनच हा लागलेला कलंक पुसण्यासाठी मी प्रथम निवडुन आल्यापासुन प्रयत्न करीत आहे त्याला सामान्य जनतेने साथ दिल्यानेच आज दुष्काळी माणच्या मातीत पाणी खळाळताना दिसत आहे मात्र येथील इंच इंच जमीन आपण जोवर ओलीताखाली आणत नाही तोवर स्वस्थ बसणार नसल्याचे प्रतिपादन माण-खटावचे आ. जयकुमार गोरे यांनी केले.
 
म्हसवड मसाईवाडी बोनेवाडी येथील बंधाऱ्यात   उरमोडीच्या पाण्याचे पुजनाच्या आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते, यावेळी माणदेशी फौडशनच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा, भाजपा तालुकाअध्यक्ष शिवाजी शिंदे, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, सुरेश म्हेत्रे, नितीन दोशी विजय धट माजी उपनगराध्यक्ष  मारुती विरकर, धनाजी माने, इंजि. सुनील पोरे, माजी नगरसेविका साळूबाई विरकर, वनीता पिसे, विठ्ठल सजगाणे, तुळशीराम गोरड, आप्पासाहेब पुकळे, शंकरशेठ विरकर आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ. गोरे म्हणाले की प्रत्येकवेळी मी नवीन संकल्प घेवुन विधानसभा लढलो, मात्र विरोधकांचा अंजेडा वेगळाच होता त्यांचा संकल्प फक्त जयकुमार गोरे कडुन होत असलेला माण- खटावचा विकास थांबवणे हा होता. 2018 साली पालिका निवडणुकीत परिवर्तन झाले शहराचा सर्वांगीण विकास करून देखील आमचा पराभव झाला, एक चुक पुढील 6 वर्ष आपण भोगत आहात याला येथील जनताच जबाबदार आहे. स्वत: पवार साहेबांनी सुध्दा या भागाला पाणी येणार नसल्याचे जाहीर सभेत सांगितले होते, आता पाणी आले आहे. फक्त पाणी आणण्याची धमक अंगी असावी लागते. मी सुरुवातीलाच हे सांगितले होते की याठिकाणी पाणी येवु शकते यामुळेच आज हा आनंद सोहळा संपन्न होत आहे. माण मधील प्रत्येक गावांना पाणी मिळाले पाहिजे ही भूमिका माझी आहे प्रत्येक गावाने हे पाणी जबाबदारीने पुढच्या गावांना कसे पोहचेल याचा विचार करावा. माण, खटावच्या मातीला लागलेला दुष्काळी कलंक पुसण्याचे काम करण्याचा मी प्रयत्न करतोय, या मातीचे सर्वाधिक नुकसान हे पवार साहेबांनी केले आहे ते या भागाचे लोकप्रतिनिधी होते त्यावेळी त्यांनी येथील पाणी प्रश्न सोडवला असता तर येथील दुष्काळ हा 25 वर्षापुर्वीच संपला असता.
मी जेव्हा निवडुन आलो त्या दिवसापासुन मी येथील पाण्यासाठी झटतोय यापुढे प्रत्येक 15 एकरावर चेंबर टाकला पाहिजे. अशी माझी भुमीका आहे, माझा जन्म हा पाण्यासाठी झाला आहे. जयकुमार गोरे हे एक पाण्याचे माध्यम आहे हे परमेश्वरालाही माहित असल्यानेच मी आज मोठ्या अपघातानंतरही तुमच्यासमोर उभा आहे. आणखी खुप कामे करायची आहेत. मी जो शब्द दिलाय तो मी पूर्ण केलाय, 39 गावांना आज पाण्याचे टँकर सुरु आहेत हे पाप जयंत पाटील यांचे आहे. शेतकऱ्याच्या    बांधापर्यंत पाणी न्यायचे आहे पाणी विकतचे आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जपून वापरण्याची आवश्यकता असल्याचे गोरे यांनी सांगितले. यावेळी माणदेशी फौंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा बोलताना म्हणाल्या की मला राजकारणात कोणताही रस नाही मात्र तालुक्यातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी जो लढा आ. गोरे यांनी उभारला ते पाहुनच मी आज या स्टेजवर आले आहे, आ. गोरे यांची चिकाटी अन् जिद्द हेच प्रमुख कारण आहे की ज्यामुळे आज माण-खटावच्या पाणी योजना मार्गी लागत आहेत, मी राजकिय पक्षापेक्षा विकासकामाला फार महत्व देते, आ. गोरे हे जेव्हापासुन माणच्या राजकारणात सक्रीय झाले आहेत तेव्हापासुन मी त्यांचा राजकिय संघर्ष पाहिला आहे हा माणुस येथील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खुप मेहनत घेत आहे अन् अशा मेहनती व्यक्तीसोबत आपण सर्वांनी मोठ्या विश्वासाने राहिले पाहिजे असे श्रीमती सिन्हा यांनी सांगितले.
यावेळी बोलताना भाजपचे तालुका अध्यक्ष शिवाजी शिंदे म्हणाले की राज्यातील सरकार हे सर्वसामान्य शेतकरी वर्गाचे आहे, या सरकार ने शेतकऱ्यासाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत, त्यामुळे शेतकरीवर्गात आज आनंदाचे वातावरण आहे, केवळ बाता मारून शेतकऱ्याचे पोट भरत नाही तर या बळीराजाला मदतीचा भक्कम हात देणे गरजेचे असते हे ओळखुनच राज्यातील सरकार काम करीत आहे.
     यावेळी मसाईवाडी बोनेवाडी म्हसवड परिसरातील शेतकरी बांधव व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!