प्रभू परमात्मा ला कोणत्याही नावाने पुकारले जात असले तरी ब्रह्मज्ञानाद्वारे त्याची ओळख करून घेतल्यानंतरच खऱ्या भक्तीला प्रारंभ होतो असे प्रतिपादन संत निरंकारी मिशनच्या प्रमुख सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांनी केले.
महाराष्ट्राचा 57 वा निरंकारी संत समागम नागपूर येथे आयोजित केला होता; त्या प्रसंगी सद्गुरु माताजी या आपल्या अनुयायांना भक्तीचा मार्ग समजून सांगताना अमूल्य मार्गदर्शनपर बोलत होत्या.
सद्गुरु माताजी आणि निरंकारी राज पिताजी यांच्या उपस्थितीत आयोजित तीन दिवसीय भव्य-दिव्य संत समागम कार्यक्रम नागपूर येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देश विदेशातून लाखोंचा जनसागर लोटला होता या जनसागरात इंदापुर व परिसरातील दोन हजाराहून अधिक निरंकारी अनुयायांचा सहभाग लाभला होता.
माताजी संबोधित करत असताना पुढे म्हणाल्या, निराकार परमात्मा सर्वत्र सामावलेला आहे. अनंत व सर्वव्यापी सर्वदूर असणाऱ्या परमात्म्याचा बोध झाल्यानंतर त्याच्याशी आपली भावनात्मक एकरूपता साधली जाते. तेव्हा आपल्यामध्ये स्वाभाविकपणेच मानवी गुणांचा समावेश होतो असे त्या म्हणाल्या.
यामध्ये आकर्षक सेवादल रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने संवादालचे जवान आणि भगिनींनी आपापल्या निश्चित गणवेशामध्ये सुसज्जित होऊन भाग घेतला. माताजी आणि निरंकारी राजपिताजी यांचे सेवादलाच्या अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
दरम्यान निरंकारी प्रदर्शनी भाविकांच्या आकर्षणाचा विषय ठरला निरंकारी बालकांनी तयार केलेले विविध प्रकारचे मॉडेल्स व इतर आधुनिक तंत्रज्ञान कॉम्बिनेशन इत्यादींच्या सहाय्याने तयार केलेले साहित्य अविष्कार या प्रदर्शनात मांडण्यात आले होते. व या निरनिराळ्या प्रकारच्या ठेवण्यात आलेल्या सर्व प्रदर्शनातील गोष्टींचा भाविकांनी उस्फूर्तपणे लाभ घेतला.