​राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांचे बिगुल वाजले; ५ फेब्रुवारीला मतदान, तर ७ फेब्रुवारीला निकाल

बातमी Share करा:

​व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला

म्हसळा (रायगड) ​: सुशील यादव

राज्यातील प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाने १५ दिवसांची मुदतवाढ दिल्यानंतर, राज्य निवडणूक आयोगाने आज १३ जानेवारी २०२६ रोजी निवडणुकांच्या तारखांची अधिकृत घोषणा केली आहे.
​निवडणुकीचे मुख्य टप्पे:
​मतदान: ५ फेब्रुवारी २०२६
​निकाल: ७ फेब्रुवारी २०२६
​मतदार यादी: १ जुलै २०२५ ची मतदार यादी या निवडणुकीसाठी वापरली जाणार आहे.
​निवडणूक होणारे जिल्हे:
राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५०% आरक्षणाची मर्यादा न ओलांडलेल्या खालील १२ जिल्ह्यांमध्ये ही निवडणूक होणार आहे आणि तिथे आचारसंहिता लागू झाली आहे:
१. पुणे २. सोलापूर ३. सातारा ४. सांगली ५. कोल्हापूर ६. लातूर ७. छत्रपती संभाजीनगर ८. परभणी ९. धाराशिव १०. रायगड ११. रत्नागिरी १२. सिंधुदुर्ग.
​महत्त्वाच्या बाबी:
​आचारसंहिता लागू: निवडणुका जाहीर झालेल्या १२ जिल्ह्यांमध्ये आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे.
​मतदान प्रक्रिया: मतदारांना दोनदा (जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी) मतदान करावे लागणार आहे.
​अर्ज प्रक्रिया: उमेदवारी अर्ज (नॉमिनेशन) ऑफलाइन पद्धतीने दाखल करता येणार आहेत.
​प्रचार: नामांकनाची मुदत संपल्यानंतरही उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करण्याची मुभा देण्यात आली आहे.
​राज्यातील ग्रामीण राजकारणाच्या दृष्टीने या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात असून, सर्वच राजकीय पक्षांनी आता निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *