उंब्रज विद्यालयातील संवगड्यांची ३२ वर्षानंतर झाली भेट.
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला)
उंब्रज/प्रतिनिधी
श्रीकांत जाधव
महात्मा गांधी विद्यालय उंब्रज येथील माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन व गुरुजनांचे आभार सोहळा संपन्न झाला. इयत्ता दहावी सन ९२-९३ व इयत्ता बारावी ९४-९५ च्या बॅचचे मित्र ३२ वर्षानंतर या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले.
जुन्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला. त्यानिमित्त ३२ शेतकऱ्यांना फळझाडे वाटप करण्यात आले.या बॅचचे माजी शिक्षक दिलीपराव माने, सुरेश घुटे, रामचंद्र ढाणे, संपतराव यादव, शंकरराव कुंभार, दत्तात्रेय इंगळे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने सकाळी
इयत्ता दहावी सन ९२-९३ व इयत्ता बारावी ९४-९५ च्या बॅचचे ५५ विद्यार्थी महात्मा गांधी विद्यालयात एकत्र आले. माजी शिक्षक दिलीपराव माने, सुरेश घुटे, रामचंद्र ढाणे, संपतराव यादव, शंकरराव कुंभार, दत्तात्रेय इंगळे यांचा विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.तब्बल ३२ वर्षानंतर एकत्र येत असल्याचे औचित्य साधून ३२ शेतकऱ्यांना फळझाडे वाटप यावेळी करण्यात आले. शाळेच्या कालावधीत एकत्रित बसून डबे खाणाऱ्या या माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित स्नेहभोजन करत जुन्या गप्पागोष्टी करुन अनेक आठवणींना उजाळा दिला. आकाश पॅलेस येथे दुपारी २ ते ५ या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय देशमाने यांनी केले व आभार प्रशांत श्रीखंडे यांनी मानले. माजी विद्यार्थी, माजी शिक्षक यावेळी उपस्थित होते. माजी शिक्षकांनी मार्गदर्शन करताना जुने अध्यापन व विद्यार्थ्यांच्या प्रामाणिकतेचे कौतुक केले. ३२ वर्षांनी एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनीही आपापली ओळख करून देत व मनोगत व्यक्त केले. ५५ जुने सवंगडी एकत्र आल्याने अनेकांना आठवणींनी गहिवरून आले.