देवापूर सरपंचपदी तात्यासाहेब औताडे यांची बिनविरोध निवड.

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
विशाल माने देवापूर:

माण तालुक्यातील देवापूर येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी तात्यासाहेब औताडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यासी अधिकारी तथा कृषी अधिकारी पंचायत समिती माण किरण उदमले निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक गटविकास अधिकारी सी.टी खाडे उपस्थित होते.

  तात्यासाहेब औताडे यांची सरपंचपदी निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत व गुलालाची उधळण करीत हलगीच्या निनादात ग्राम दैवतांचे दर्शन घेऊन संपूर्ण गावात फटाक्याच्या आतषबाजी सवाद्य मिरवणूक काढली.देवापूर ग्रामस्थांनी सत्कार करुन आपला आनंद व्यक्त करत ग्राम विकासाची अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी माजी सरपंच मंगला बाबासाहेब बनसोडे , उपसरपंच मंगला सयाजी चव्हाण , सदस्य शहाजी बाबर , तानुबाई बाबर , अलका चव्हाण , सविता बाबर , सुनिता कांबळे , निशिगंधा बनसोडे आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. त्याचबरोबर विविध संस्थांचे पदाधिकारी व पंच क्रोशितील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडणुक अनुषंगाने महिलांचाही उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.


माण तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या देवापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी तात्यासाहेब औताडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळत्या सरपंच मंगला बनसोडे यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी सरपंच पदाच्या निवडीसाठी शनिवार दि. ११ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी सी.टी.खाडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलविण्यात आली होती . यावेळी सरपंच पदासाठी तात्यासाहेब औताडे यांचा निर्धारित वेळेत एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
तात्यासाहेब औताडे यांची सरपंचपदी निवड झाल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर त्यांचा सत्कार करून भव्य मिरवणूक काढत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामसेवक, आजी माजी सरपंच, उपसरपंच, आजी माजी चेअरमन, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांच्यावर राजकीय शैक्षणिक सामाजिक स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

यावेळी सरपंचपदी निवड झाल्यानंतर तात्यासाहेब औताडे प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले कि देवापूरच्या गावकऱ्यांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेन. माजी सरपंच शहाजी बाबर, मां. सरपंच मंगला बनसोडे व सदस्य, नागरिक यांनी दाखवलेला विश्वास सार्थ करेन. शासनाच्या विविध योजना आणून पारदर्शीपणे काम करून सर्वांना विश्वासात घेऊन ग्राम विकास अमलात आणेन. ऐतिहासिक, शैक्षणिक वारसा असणाऱ्या या गावांला विकासात्मक पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यानी सांगितले
यावेळी किसान काँग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष कृषी मित्र प्रा . विश्वंभर बाबर , माजी सरपंच शहाजी बाबर , लाडकी बहिण योजनेचे माण तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पुकळे , ॲड. विठ्ठल वीरकर, विजयशेठ बनगर, निवृत्त ए. पी.आय रमेश लोखंडे सुलोचना बाबर , माजी सरपंच मंगल बनसोडे , बाबासाहेब बनसोडे , राजू माने पत्रकार विशाल माने यांनी मनोगत व्यक्त केले. विठ्ठल काटकर सर यांनी सुत्रसंचांलन केले . मोहन बाबर यांनी आभार मानले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!