सौ.जाकिरा मुल्ला यांना औरंगाबाद येथे “जीवन गौरव ” पुरस्काराने सन्मानित*

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज
BY;Ahmad Mulla
म्हसवड दि प्रतिनीधी
शिक्षकांना जीवनगौरव पुरस्कार दिल्याने हेच पुरस्कारर्थी आगामी काळात विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सुज्ञ व नवसमाज निर्मितीचे काम करतील, असा आशावाद शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी व्यक्त केला. बोधी ट्री एज्युकेशन फाउंडेशनतर्फे राज्यातील ३६ पुरस्कार्थांना रविवारी (२९ जानेवारी) जीवन गौरव पुरस्काराने ऐतिहासिक शहर म्हणून ख्याती असलेल्या औरंगाबाद या शहरात सन्मानित केले. त्या वेळी ते बोलत होते.
एमजीएम युनिव्हर्सिटी परिसरातील आर्यभट्ट सभागृहात आयोजित या विशेष सोहळ्याचे उद्घाटक आरोग्य आणि सुरक्षा विभागाचे उपसंचालक धीरज खिरोडकर होते तर अजंता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.प्रवीण चाबुकस्वार, टॅक्स प्रॅक्टिशनर शेख सिराज सुजाउद्दीन उपस्थिती होते तर या पुरस्काराचे विशेष आकर्षण सिने अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर यांची मोलाची उपस्थिती मंचावर होती.
शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार-
जाकिरा जावेद मुल्ला (सातारा),तुकाराम भवर (औरंगाबाद), जयश्री पवार (औरंगाबाद) डॉ. गायत्री पाटील (नंदुरबार) डॉ. कैलास काकडे (अमरावती) मनीषा शिरटावले (सातारा) अनुपमा दाभाडे, कुसुम मेरुरकर (सातारा) रसिका रेवाळे (रत्नागिरी) संजय पाटील (पालघर) भारती शिवनकर (गडचिरोली) सोनी कानडे (सोलापूर) दर्शना मुकणे (पालघर)  गोविंद देसाई (कोल्हापूर) मनोहर मोहरे (पुणे)
जाकिरा मुल्ला या सातारा जिल्हा परिषदेच्या माण तालुक्यातील पवारमळा (भाटकी) या शाळेवर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक यासारख्या विविध निकषाद्वारे केलेल्या गुणांकणाच्या आधारे सौ. जाकिरा मुल्ला यांची निवड करणेत आली होती.
कार्यक्रमाचे उदघाटक धीरज खिरोडकर आपल्या मनोगतात म्हणाले की, बोधी ट्री एज्युकेशनल फाउंडेशन ही संस्था नोबल कार्य करत आहे. वंचित दुर्बल घटकातील मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणून त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत आहे ही बाब कौतुकास्पद आहे. अजंता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रवीण चाबुकस्वार म्हणाले की संस्थेचे कार्य हे अनमोल कार्य आहे अनाथांना, निराधारांना आधार देण्याचं काम ही संस्था करत आहे. प्रसिद्ध सिने अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर आपल्या मनोगतात म्हणाल्या की, आज माझ्या शिक्षक आईला माझ्या हस्ते पुरस्कार मिळत आहे हे भाग्य मला आज या संस्थेने मिळून दिले.संस्थेचे प्रमुख तथा कार्यक्रमाचे आयोजक रामदास वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय भाषणात अनिल साबळे म्हणाले, ‘शासनही वंचित दुर्बल घटकातील मुला मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी  कार्य करत आहे. एकही मुल शिक्षणापासून वंचित राहता कामा नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत परंतु यात कुठेतरी शासन पोचू शकत नाही त्या ठिकाणी एनजीओ बोधी ट्री एज्युकेशनल फाउंडेशन ही संस्था अशा मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणत आहे खरोखरच या संस्थेचे अभिनंदन करावेसे तेवढे कमीच आहे.
 कार्यक्रमाचे आयोजक वाघमारे यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या कार्याविषयी व पुरस्कारार्थीची निवड करण्यासाठी काय निकष वापरले याचा उहापोह केला. प्रसिद्ध व्याख्याते संदीप ढाकणे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रसिद्ध गझलकार रज्जाक शेख यांनी आभार मानले.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!