पाच लाख भाविकांच्या उपस्थितीत श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी यांच्या रथावर गुलाल खोबऱ्याची उधळण करीत सिध्दनाथाच्या नावानं चांगभल’च्या जयघोषात रथोत्सवाची सांगता

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड : प्रतिनिधी
सिध्दनाथाच्या नावानं चांगभल’च्या जयघोषात व सुमारे पाच लाख भाविकांच्या उपस्थितीत श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी यांच्या रथावर गुलाल खोबऱ्याची उधळण करीत रथोत्सव मोठ्या  उत्साहात पार पडला.
 अखिल महाराष्ट्र तसेच आंध्र, कर्नाटक या  राज्यातील अनेक भाविकांचे श्रध्दास्थान व दैवत  असणार्‍या म्हसवड येथील श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी यांच्या उत्सवमूर्ती सालकरी यांच्या घरुन वाजत-गाजत रथामध्ये बसवण्यात आल्या.  रथामध्ये उत्सवमूर्ती बसवल्यानंतर श्रींच्या मूर्तींच्या रथातून मिरवणुकीस प्रारंभ झाला. रथावर बसण्याचा मान राजेमाने घराण्याचा असून  अजितराव राजेमाने, बाळासाहेब राजेमाने, पृथ्वीराज राजेमाने,  सयाजी राजेमाने, विजयसिंह राजेमाने, गणपतराव  राजेमाने, शिवराज राजेमाने, तेजसिंह राजेमाने,  दिपसिंह राजेमाने, शहाजीराजे राजेमाने, विश्वजित राजेमाने तसेच बाळासाहेब माने,माजी कोकण  आयुक्त प्रभाकर देशमुख, पोलीस उपविभागीय अधिकारी ,तहसीलदार,मुख्याधिकारी डॉ सचिन माने,सपोनि राजकुमार भुजबळ ,यांच्या उपस्थित रथोत्सवास प्रारंभ झाला.
 श्रींचा विवाह सोहळा एक महिनाभर चालतो.  दिवाळी पाडव्यादिवशी घटस्थापनेचे व हळदी  समारंभाने या विवाह सोहळ्यास प्रारंभ झाला.  त्यानंतर तुळशीविवाह, श्री सिध्दनाथांचा व माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा संपन्न होवून  आज  बुधवार रोजी लग्नानंतरची वरात म्हणजेच रथोत्सव संपन्न झाला.
दुपारी दोन वाजता रथ नगरप्रदक्षिणेस सुरुवात झाली  यावेळी  बायपास रस्त्याने न जाता पारंपारिक पद्धतीने नदीपात्रातून  सुरुवात झाली  . भाविकांनी  सिद्धनाथाच्या नावाने चांगभलं च्या गजरात रथावर गुलाल व खोबर्‍याची उधळण केली. तसेच  अनेक भक्तांनी निशाने, नारळाची तोरणे, पैशांच्या नोटांची तोरणे श्रींना अर्पण केली. अवघी म्हसवडनगरी  गुलालात न्हाऊन गेली होती.  रथ नगरप्रदक्षिणेसाठी निघाल्यानंतर उजवी   प्रदक्षिणा घालून पारंपारिक पद्धतीने नदीपात्रातून सरळ सुर्यवंशी याच्या विहिरीपासून वळून चिराग मुल्ला वेल्डींग दुकान,चंदू पिसे यांच्या गॅरेजपासून ते सातारा पंढरपूर रोडवरुन  बसस्थानक चौकातून सातारा – पंढरपूर रस्त्यावर ओढत आणला. तेथून पुढे श्री सिध्दनाथ यांच्या बहिणीस मानकर्‍यांच्या हस्ते साडी-चोळी यांचा आहेर करण्यात आला. याच ठिकाणी नवसाची मुले रथावरुन खाली टाकण्यात आली व नवस फेडण्यात आले.  त्यानंतर रथ वाघजाई ओढ्यातून पुढे कन्या  विद्यालय श्री लक्ष्मीआई मरीआई मंदिर ते रिंगावन पेठ मैदान मार्गावरुन रथाने  नगरप्रदक्षिणा पूर्ण  केली.
        भाविकांच्या सोयीसाठी एस. टी. महामंडळातर्फे   कराड, वडूज, अकलूज, विटा, सातारा, मेढा,  सोलापूर, पंढरपूर, आटपाडी आदी आगारांनी जादा बसेस  सोडल्या होत्या.म्हसवड पोलिस स्ठेशनच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवला होता. यामध्ये पोलिस उपअधीक्षक,सपोनि राजकुमार भुजबळ,  यांच्यासह १५ पोलिस अधिकारी, १२५ पोलिस अंमलदार,१५० होमगार्ड ,२५० स्वयंसेवक,५० पोलीस पाटील महिला अधिकारी, ,  आपत्कालीन पथक यांचा   समावेश  होता. यावेळी   माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख,आ. जयकुमार गोरे,इंजिनियर सुनील पोरे, भाजपा ओबीसी युवक प्रदेशाध्यक्ष  करण पोरे, माजी नगराध्यक्ष नितिनशेठ दोशी  , ,प्रा. विश्वंभर बाबर ,जिल्हा उपाध्यक्ष रासपचे दादासाहेब दोरगे, माण खटाव विधानसभा अध्यक्ष आप्पासाहेब पुकळे, किरण शेठ कलढोणे ,माजी नगरसेवक कैलास भोरे, माण तालुका कृषीउत्पन्न बाजार समिती सभापती विलासराव देशमुख ,  महेंद्रकुमार मोडासे,शिवसेना तालुका अध्यक्ष बाळासाहेब मुलाणी ,महेश सोनवले ,विधाता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सचिन नवगण ,अशोक काळे,बाळासाहेब पानसांडे, पै.महालिंग खांडेकर ,  अहमद मुल्ला, इमरान मुल्ला ,जगन्नाथ दहिवडे,  दिलीप आप्पासो माने , राष्ट्रीय कॉंग्रेस माण तालुका अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष इन्नूस काझी  गाव कामगार तलाठी उत्तमराव आखडमल आदींनी सिद्धनाथाच्या रथावर गुलाल खोबर्‍याची उधळण केली.
 रथ यात्रे निमित्त मंदीरात श्रीचे दर्शनासाठी भाविकांच्या पहाटे पासुनच दर्शनबारीत  भाविकांच्या रांगा लागलेल्या होत्या. यात्रे निमित्त रिंगावण पेठ मैदानातील यात्रा भरली आहे यात्रेत खरेदीसाठी भाविकांची मोठी गर्दी आज दिवसभर टिकुन होती.उंच व गोलाकार फिरणारे यांत्रिक पाळणे,मौतका कुँवा,नाना-नानी पार्क इत्यादी खेळांच्या साधनाकडे बालगोपाऴांची मोठी गर्दी होती. विविध मिठाई विक्रते, खेळणी,व इतर साहित्य विक्रेत्यांचीही दुकाने भाविकांच्या गर्दीने फुलुन गेली होती.
भाविकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने यंदा यात्रा नियोजनात खुपच बदल करण्यात आल्याने ठिक ठीकाणी गावाजवळच पर्यायी वाहनतळ सुविधा करण्यात आली होती. गावोगावच्या मानाच्या काट्या  सासणे मुक्कामासाठी बाजार पटांगणात सुविधा  करण्यात आली होती.विशेष बाब म्हणजे यात्रा  सुरक्षित पार पाडण्यासाठी प्रथमच प्रशासन पातळीवर खुपच दक्षता घेण्यात आली होती. गणेश म्हेत्रे यांचे यात्रा शांततेत पार पाडण्यात मोठी मदत झाली संपूर्ण यात्रा कालावधीत लाउड स्पीकरवर यात्रेकरूना सूचना देण्याचे काम  त्यांनीच केले
   प्रशासनाच्यावतीने प्रांताधिकारी, डी वाय एस पी,सपोनि,तहसिलदार, म्हसवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ सचिन माने, पोलीस गोपनीय विभागाचेअभिजित भादुले , इंजिनियर चैतन्य देशमाने ,नितीन लोखंडे व नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी, पुरवठा  अधिकारी, गावकामगार तलाठी उत्तमराव आखडमल  तलाठी गुलाबराव उगलमोगल,   यांनी रथोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी विशेष  प्रयत्न केले.
छाया: धनंजय पानसांडे

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!