कचरा हटवण्यासाठी शिवसेनेचे निवेदन, उंब्रज ग्रामपंचायत सरपंचांनी दिले तत्काळ कारवाईचे आश्वासन

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते
उंब्रज | प्रतिनिधी

उत्तर मांड नदीवरील सर्व्हिस रस्त्याच्या पुलावर तसेच शिवडे-उंब्रज साकव पुलावर साचलेल्या कचऱ्यामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधी व आरोग्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कराड उत्तरच्या वतीने ग्रामपंचायत उंब्रज यांना निवेदन देण्यात आले.

हे निवेदन तालुकाप्रमुख श्री. संजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली सरपंच मा. श्री. योगीराज जाधव यांना देण्यात आले. या प्रसंगी शिवसैनिक व ग्रामस्थ श्री. रामराव घाडगे, बाळासाहेब मदने, प्रकाश सुतार, अनिल जांभळे, लहुदास कांबळे, कोंडीबा गुजले, शंकरराव घार्गे, हणमंतराव भोसले, राहुल मदने, आनंदा जाधव, गंधर्व अडसुळे उपस्थित होते.

नदीपात्र व पुलावर साचणाऱ्या कचऱ्यामुळे उंब्रज, शिवडे, हनुमानवाडी, वडोली, भवानवाडी या परिसरातील नागरिकांना व विशेषतः शाळकरी विद्यार्थी, महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होत असून, भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तात्काळ कचरा हटवून भविष्यात तो टाकला जाऊ नये यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

या निवेदनावर चर्चा करताना सरपंच श्री. योगीराज जाधव यांनी तातडीने कचरा हटविण्याचे आश्वासन दिले. तसेच संबंधित विभागास याची माहिती देऊन या समस्येवर लवकरात लवकर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल असे सांगितले. भविष्यात जो कोणी संबंधित ठिकाणी कचरा टाकताना आढळेल, त्याच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेना व ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात जर त्वरित कार्यवाही झाली नाही, तर शिवडे, हनुमानवाडी, वडवली, बिकेश्वर, भवानवाडी या गावांतील ग्रामस्थांना सोबत घेऊन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!