महाराष्ट्रात शिवसेनेची लाट येणार – राहुल चव्हाण पाटील (माढा लोकसभा निरीक्षक)

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )

म्हसवड

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संपुर्ण राज्यभरात गावोगावी “होऊ द्या चर्चा” अभियान सुरू आहे.
त्या अभियानाच्या अंतर्गत राहुल चव्हाण पाटील यांचा माढा लोकसभा मतदारसंघात मागच्या काही दिवसापासून दौरा सुरू आहे.
ते म्हसवड येथे कॉर्नर सभेत “होऊ द्या चर्चा” कार्यक्रमात बोलताना श्री.राहुल चव्हाण पाटील म्हणाले की,गेल्या नऊ वर्षापासून केंद्रातील मोदी सरकार हे देशातीलच नव्हे, तर राज्यातील जनतेचं वाटोळं केलं आहे.या सरकारने गेल्या नऊ वर्षात फक्त आश्वासनांचा भडिमार केला आहे. जनतेला वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून वेठीस धरले त्यामुळे शिवसेनेने आता या बोलघेवड्या सरकारच्या अपयशी ठरलेल्या योजना व जनतेला दिलेली पोकळ आश्वासन याचा निषेध करण्याचा ठरवले आहे..
पुढे बोलताना राहुल चव्हाण पाटील यांनी जनतेला काही प्रश्न केले. काय झाले आत्मनिर्भर भारताचे? काय झाले स्किल इंडियाचे? काश्मिरी पंडित काश्मीर मध्ये आले का? तुमच्या खात्यात 15 लाख रुपये आले का ? दोन कोटी तरुणांना रोजगार मिळाला का? महागाई कमी होणार होती काय झालं? २०० स्मार्ट सिटी चे काय झालं? राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचे काय झाले? रुग्ण मरत आहेत काय करताय आरोग्य मंत्री? माण- खटाव तालुक्यातील पाणी प्रश्नाचे काय झालं..? तालुक्यातील MIDC चे काय झालं…? ते म्हणाले की, या सरकारने ना छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्राचे स्मारक केले ना बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिल येथील स्मारक केले,फक्त घोषणा केल्या अंमलात मात्र काही आणले गेले नाही.त्यामुळेच हे लबाडांचे राज्य म्हणावे लागेल असे ते म्हणाले.
या देशात लोकशाही जिवंत आहे की नाही.कारण हे राज्य महाराष्ट्राच्या नाही तर, दिल्लीश्वराच्या आशीर्वादाने चालु आहे
कोरोना काळात उध्दव जी ठाकरे यांनी महाराष्ट्र उत्तमरीत्या साभाळला,शेतकऱ्यांना २ लाख रुपये कर्जमाफी केली.उद्धव साहेबांचे राज्य हे सर्वसामान्य जनतेचे राज्य होते. पण काही गद्दार या महाराष्ट्रात जन्माला आले. त्या गद्दार मिंदेना आता धडा शिकवा व २०२४ मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेवर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकवा. उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यात ठाकरे सरकार येईल या साठी कामाला लागा.असे आवाहन त्यांनी म्हसवड गावातील नागरिकांना केले या कार्यक्रमाप्रंगी जिल्हा संघटिका छाया ताई शिंदे,तालुका प्रमुख बाळासाहेब मदने,उपतालुकाप्रमुख माण शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवदास केवटे यांच्या नियोजनात प्रमुख पाहुणे राहुल चव्हाण छायाताई शिंदे माण तालुका प्रमुख बाळासाहेब मदने शहरप्रमुख राहुल मंगरुळे विद्यार्थी सेना प्रमुख सोमनाथ कवी विभाग प्रमुख बापू कबीर इतर सर्व शिवसैनिक मोठ्या संखेने उपस्थित होते


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!