शरद पवारांचे प्रचंड कार्यच राष्ट्रवादीला अव्वल स्थानी आणेल ; महिबूब शेख यांचे मत .
व्हिजन २४ तास न्युज
BY; Ahmad Mulla
आटपाडी दि .२५ ( प्रतिनिधी )
गत पाच दशके शरद पवार साहेबांनी केलेल्या महाराष्ट्र – देश मजबुत करण्याच्या प्रचंड कार्याची दखल जगाने घेतली, ते प्रचंड कार्य तळागाळातल्या प्रत्येक समाज घटकांपर्यत पोहचवा . या कार्यानी भारावलेले करोडो लोक राष्ट्रवादी काँग्रेसला एकहाती सत्तेवर आणतील . असा विश्वास महिबूब शेख यांनी येथे बोलताना व्यक्त केला .
राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढ दिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्या प्रेरणेने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महिबूब शेख यांच्या नेतृत्वा खाली महाराष्ट्रभर सुरु असलेल्या शरद युवा संवाद यात्रेच्या ३५३ व्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून महिबूब शेख बोलत होते . पक्षाचे जिल्हा सरचिटणीस ज्येष्ट नेते बाळासाहेबबापू पाटील अध्यक्षस्थानी होते .
लाखोंना रोजगार देणारे पुण्याचे आयटी हब निर्मिती असेल, साखर कारखाने, असंख्य उद्योग, व्यवसाय सूतगिरण्या, दूध संस्था, वगैरे शेकडो उद्योग महाराष्ट्रामध्ये उभारण्यात पवार साहेबांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे . मराठवाडा विद्यापीठाला डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा निर्णय पवार साहेबांनीच केला . देशात सर्वप्रथम मंडल आयोग राबवण्याची भूमिका पवार साहेबांनी महाराष्ट्रात घेतली, विविध जाती, जमाती धर्माच्या, कर्तुत्व संपन्न नेत्यांना आमदार खासदार मंत्री, पक्षाचे पदाधिकारी करण्याचे मोठे काम पवार साहेबांनी केले. समतेचे राजकारण करणारे पवार साहेबच खरे महाराष्ट्राचे लोकनेते आहेत . जयंतराव साहेब, अजितदादा या सारख्या अनेक नेत्यांनीही प्रचंड कार्य केल्याकडे लक्ष वेधून महिबूब शेख यांनी, उठ सुठ पवार साहेब, अजितदादा , जयंतराव पाटील साहेब वगैरे मान्यवरांवर बेछुट असभ्य टीका टीपन्नी करणारांनी आपली लायकी ओळखावी . शिव्याशाप देण्यापेक्षा राज्यात – देशात असलेल्या भाजपाच्या सत्तेतून येत्या काळात धनगर समाजाला एस . टी . चे आरक्षण मिळवावे . मी स्वतः त्यांचा सत्कार करणेस येथे येईन . ज्या ओबीसी नेत्यांनी भाजपा मोठी केली त्यातल्या अनेकांना मोक्याची वेळी भाजपने मोडून काढले . मंडल विरोधी भूमिका घेणाऱ्या भाजपाने महादेव जानकरांसारख्या सरळमार्गी नेत्याला दिलेली वागणूक भविष्यात तुमच्याही वाट्याला येवू शकते याचा विसर पडू देवू नका . असा इशाराही त्यांनी दिला . सामान्यांचे प्रश्न समस्या अडचणी व्यथा वेदना जाणून त्या सोडविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने घोड्यासारखे प्रचंड उर्जेने रात्रंदिवस काम करावे . असा सल्लाही महिबूब शेख यांनी दिला .
सांगली जिल्ह्यात सुरज पाटील यांचे नेतृत्वाखाली आटपाडी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे काम उत्तम असल्याची ग्वाही युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराजदादा नाईक यांनी दिली . तर राष्ट्रवादीच्या झेंड्या खाली लाखो युवकांचे मजबूत संघटन करण्यासाठीच शरद युवा संवाद यात्रा महाराष्ट्र भर फिरत असल्याचे राष्ट्रवादीचे निरीक्षक अक्षय भांड यांनी स्पष्ट केले .
राष्ट्रवादीच्या कोणत्याही सेलच्या कार्यक्रमाला मतदार संघातील पक्षाचे आजी – माजी आमदार, खासदार , पक्षाचे सर्वच पदाधिकारी, नेते उपस्थित राहीले पाहीजेत . तरच कार्यकर्त्यांमध्ये सळसळणारी चेतना निर्माण होवू शकेल . असे प्रारंभीच स्पष्ट करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक यांनी, राज्यातील राष्ट्रवादीचे संसद सदस्य, विधिमंडळ सदस्य, यांनी आपल्या मतदार संघाबरोबरच आणखी तीन नवीन विधानसभा मतदार संघ दत्तक घेवून तेथे पक्षाचे कार्य, ध्येय धोरणे, विचार पेरत त्या तीन नवीन मतदार संघातील वातावरण राष्ट्रवादीमय करण्यासाठी योगदान द्यावे. खासदार शरद पवार साहेब, राजारामबापू पाटील, आमदार जयंतराव पाटील यांना मानणाऱ्या या खानापूर विधानसभा मतदार संघात सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्ते आणि आटपाडी तालुक्यावर सदैव अन्यायच झाला आहे. एकूण १४ निवडणूकीत फक्त दोन वेळा आटपाडीकर आमदार होवू शकले, हे वास्तव आहे . सदैव एखाद्या नेत्याला अपेक्षित निर्णय केल्याने, तो नेता पक्षापासून बाजुला जाताच मोठी किंमत मोजण्याची वेळ पक्षावर यापूर्वी अनेक वेळा आली आहे . तळागाळातील हजारो कार्यकर्त्याना बळ देत, मतदार संघ भक्कम केल्यास, कोणा नेत्याच्या जाण्या – येण्याने पक्षावर कसलाही परिणाम होणार नाही आणि पक्ष देईल तो उमेदवारच जिंकला पाहीजे . लोकांनी जात – पात – धर्म – पैसा – आडका न पाहता पक्षाकडे पाहूनच आमदार, खासदार निवडले पाहिजेत, असेच सर्वत्र वातावरण निर्माण झाले पाहीजे, तसे ते केले गेले पाहीजे . १७ वर्षापासून या मतदार संघात राष्ट्रवादीचा आमदार नाही. आणखी पुढची पाच वर्षे राष्ट्रवादीकडे आमदारकी येणार नाही असे समजून , पाच दशके राजारामबापू आणि जयंतराव पाटील यांच्या निष्ठेचा मंत्र जपत पैलतीराकडे चाललेल्या रावसाहेबकाका पाटील यांना राष्ट्रवादीने उमेदवारी देत आटपाडी वरचा अन्याय दुर करावा . असे ही शेवटी सादिक खाटीक यांनी म्हटले आहे .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश ऐवळे यांनी केले, स्वागत व प्रास्तावीक आटपाडी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरज पाटील यांनी केले .
राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस राजू जानकर , युवकचे प्रदेश सचिव प्रा . नारायण खरजे, जालिंदर कटरे, रणजित पाटील , परशुराम सरक, प्रशांत मोटे , विशाल चव्हाण, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले .
यावेळी सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादीचे निरीक्षक अरुणभाऊ आसबे, युवा नेते रोहित देशमुख , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय यमगर, आटपाडीचे युवा नेते आबासाहेब नांगरे पाटील, राष्ट्रवादी सोशल मीडिया तालुकाध्यक्ष किशोर गायकवाड, युवक नेते मनोज भोसले , विशाल जाधव दिपक पाटील, प्रशांत गाढवे, तालुका राष्ट्रवादी युवक सरचिटणीस नितीन डांगे ,जितेंद्र पाटील, ऋषिकेश सरक, विशाल सरक, विनोद बनसोडे, समाधान भोसले, सागर डोईफोडे, आलम कांबळे , मुन्ना मुलाणी, विजय मोटे अभिजित जवळे , राहुल रेड्डी, आशिष जाधव , गणेश कबीर, सागर सोहनी, ,संतोष बाड , दिपक सावंत सुनील लेंगरे यांच्या सह तालुक्यातील अनेक युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी नितीन डांगे यांनी आभार मानले .