स्थानिक गुन्हे शाखा, सातारा व सायबर पोलीस स्टेशनची कामगिरी: २० लाख,१० हजार, रु. किमंतीचे १०० मोबाईलचा शोध घेवून मूळ मालकांना परत
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
सादिक शेख (नाशिक पोलीस टाइम्स )
सातारा जिल्हा प्रतिनिधी
सातारा जिल्हयातील नागरीकांचे वापरणेत येणारे मोबाईल गहाळ झाले होते. त्याबाबतचा मा. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख यांनी CIU UNIT- स्थानिक गुन्हे शाखा, सातारा व सायबर पोलीस ठाणेकडील अधिकारी अंमलदार यांचेकडुन माहिती घेवून त्यांना आदेशीत केले की, सातारा जिल्हयातील नागरीकांचे गहाळ झालेल्या मोबाईलची तात्रिक माहितीच्या आधारे शोध मोहिम
राबवुन जास्तीत जास्त मोबाईल नागरीकांना परत कसे करता येईल याबाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक श्री. बापू बांगर, पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा, व पोलीस निरीक्षक सुनिल शेळके, सायबर पोलीस ठाणे, सातारा यांनीCIU UNIT-स्थानिक गुन्हे शाखा, सातारा व सायबर पोलीस ठाणेकडील अमित झेंडे पोहेकॉ. ८७१, अजय जाधव पोहेकॉ. १५ यांचे पथक तयार करुन सातारा जिल्हयातुन गहाळ झालेले मोबाईल शोधकामी नेमणेत आले होते. नमुद पथकांनी तांत्रिक माहितीचे अत्यंत तंत्रशुध्द पध्दतीने विश्लेषण करुन २०लाख,१०हजार, रु. मुळ किमंतीचे १०० मोबाईल शोधुन ते ताब्यात घेणेत पोलीस पथकास यशआले आहे.आज दि १०/०६/२०२३ रोजी ज्या नागरीकांचे मोबाईल मिळुन आले आहेत त्या नागरीकांना मोबाईल हे त्यांचेकडील कागदपत्रांची ओळख पटवुन मा. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्री. बापू बांगर, पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा,सातारा, व पोलीस निरीक्षक सुनिल शेळके, सायबर पोलीस ठाणे सातारा व CIU UNIT- स्थानिक गुन्हे शाखा, सातारा व सायबर पोलीस ठाणेकडील अमित झेंडे पोहेकॉ. ८७१, अजय जाधव पोहेकॉ.१५, व मुनिर मुल्ला पोहेकॉ. ६७४ नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांचे उपस्थितीत मोबाईल देण्यात आले. नागरीकांना त्याच्या हरवलेला मोबाईल मिळेल असे अपेक्षित नसताना पुन्हा मोबाईल
मिळाल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले व तसेच मोबाईल मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसुन आला. तसेच मा. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्री.बापू बांगर,यांनी पथकाचे अभिनंदन करुन भविष्यात देखील तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जास्तीत जास्त मोबाईल नागरीकांना परत करण्याबाबत सुचना दिल्या असुन ही मोहीम भविष्यात देखील सतत राबविण्यात येणार आहेत.