व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड.. प्रतिनिधी माणगंगा नदी च्या विरकरवाडी रस्त्यावरील पुलाची खूपच दयनीय अवस्था झाली असून खराब झालेल्या पूल बांधकामाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी राष्ट्रीय काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे.
माणगंगा नदीवरील पुलाची तातडीने दुरुस्त होणे कामे प्रदेश किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर, म्हसवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास गोंजारी, जिल्हा सरचिटणीस विष्णुपंत अवघडे , युवक काँग्रेसची दाऊद मुल्ला इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या सहीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम कार्यालय दहिवडी यांना दिले आहे.
म्हसवड शहरा नजीक माणगंगा नदीवर म्हसवड ते वीरकरवाडी, पुळकोटी, देवापुर, वरकुटे मलवडी, या परिसराला जोडणारा महत्वपूर्ण पूल आहे. सदर पुलाचे बांधकाम तात्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कालावधीत झालेले आहे. बांधकाम होऊन बरेच वर्षे झाली. गेल्या दोन वर्षात सदर पुलाचे बांधकाम जागोजागी विस्कळीत होत चाललेले आहे. माणगंगा नदी पुलावरील पृष्ठभागावर अनेक ठिकाणी स्लॅब मधील लोखंडी गज वर आलेले असून ते वाहनधारका साठी धोकादायक आहेत. याबरोबरच सदर उचकटलेल्या गजाच्या फटी मधून पाणी पाझरून पुलाचे बांधकाम ठिकठिकाणी निकृष्ट होऊ लागलेले आहे. यापूर्वी सांगून सुद्धा या बांधकामाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दहिवडी कार्यालयाने दुर्लक्ष केलेले आहे. सदरचा प्रकार थोडक्यात सांगायचं म्हटलं तर नाला साठी घोडा वाया घालवण्याचा प्रकार असून दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा पूल वेळीच लक्ष न दिल्यास वाहतुकीच्या दृष्टीने आगामी कालावधीत गैरसोयीचा होणार असल्याचे राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे ज्युनिअर इंजिनीयर विजापूरे यांना सांगितले आहे. मात्र त्यांनी या कामाकडे दुर्लक्ष केले असून सदर काम तातडीने मार्गी न लागल्यास विजापुरे यांच्याविरुद्ध वरिष्ठाकडे तक्रार करून आंदोलन छेडण्याचा इशारा प्राध्यापक विश्वंभर बाबर व राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.