शासन आपल्या दारी कार्यक्रमातून”शासकीय काम आणि सहा महिने थांब” हि प्रचलित परंपरा मोडीत काढण्याचा आमचा उद्देश – मंत्री आदिती तटकरे

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

रायगड 

म्हसळा – सुशील यादव

शासकीय काम आणि सहा महिने थांब अशी गेल्या अनेक वर्षांपासून लोकांच्या मनातील भुमिकेत बदल करायचे उद्देशाने पडलेली प्रचलित परंपरा कायम मोडीत काढण्याचा आमचा उद्देश आहे.राज्यातील नागरिकांना केंद्र आणि राज्य सरकारचे विविध योजनांचा लाभ तत्काळ घेता यावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतुन शासन आपल्या दारी कार्यक्रम जिल्हा आणि तालुका स्तरावर आयोजीत करण्यात येत असल्याचे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हसळा न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना सांगीतले.

      मागील महिन्यांत गोरेगाव लोणेरे येथे रायगड जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पालकमंत्री,खासदार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला होता.त्याच अनुषंगाने तालुका स्तरावरील लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ दुपटीने देता यावा यासाठी श्रीवर्धन, म्हसळा आणि तळा तालुक्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगताना श्रीवर्धन तालुक्यात ३००० हजार,तळा तालुक्यात १५०० आणि म्हसळा तालुक्यात एक लाखाहून अधिक लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला असल्याचे निदर्शनास आणून दिले.

 म्हसळा तालुका शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे नीटनेटक्या आयोजनात हजारो लाभार्थ्यांनी गर्दी केली होती या वेळी मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते अनेक गावांतील लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभाचे वितरण व दाखल्यांचे वाटप करण्यात आले.शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजना प्रमाणेच म्हसळा तालुक्यात आरोग्य शिबिराचा लाभ देण्यात येत आहे त्याचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.
         कार्यक्रमाला माजी सभापती महादेव पाटील,बबन मनवे,छाया म्हात्रे, संदीप चाचले,नाना सावंत,सोनल घोले,मिना टिंगरे,वृषाली घोसाळकर,नगरसेविका जयश्री कापरे,सरोज म्हशिलकर,राखी करंबे,नौसीन चोगले,सूमैया आमदनी,शिंदेसेना उपतालुका प्रमुख अक्रम साने,भाजपचे जिल्हा चिटणीस निलेश मांदाडकर,शहरअध्यक्ष प्रसन्ना निजामपुरकर,विशेष कार्यकारी अधिकारी अमित शेडगे,प्रांताधिकारी महेश पाटील,तहसीलदार समीर घारे,नायब तहसिलदार धर्मराज पाटिल,मुख्याधिकारी विठ्ठल राठोड,गट विकास अधिकारी कुलदीप बोंगे,पोलिस निरीक्षक पवन चौधरी,वाहतूक पोलिस निरीक्षक संदीपान सोनवणे,आरोग्य अधिकारी डॉ महेश मेहता,प्रकल्प अधिकारी श्रीमती कलबास्कर,कृषि अधिकारी राजेंद्र ढांगारे,महावितरण अभियंता पटवारी,न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य प्रकाश हाके आदी मान्यवर पदाधिकारी आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   प्रास्ताविकात प्रांत अधिकारी महेश पाटील यांनी शासनाच्या २०० हुन अधिक योजनांचा लाभ लाभार्थ्यांनी घेण्याचे आवाहन केले.यासाठी शासन आपल्या दारी कार्यक्रमात २१ स्टॉल लावण्यात आले होते या मध्ये प्रामुख्याने सामजिक वनीकरण,महावितरण,नगर विकास,महीला बचत गटाचे ३ स्टॉल,रायगड जिल्हा पोलिस विभाग,महसूल विभाग,पंचायत शिक्षण विभाग,एकात्मिक बाल विकास प्रकल्प,महसूल संजय गांधी निराधार योजना,आयुष्यमान,आरोग्य विभाग,आपले सरकार सेवा केंद्र,महसूल विभाग पुरवठा शाखा,महसूल विभाग सेतु कार्यालय,महसूल निवडणूक शाखा,प्रसिद्धी व जनजागृती कार्यालय,पंतप्रधान सुरक्षा योजना ,(विमा योजना)बँक ऑफ इंडिया शाखा आदी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

        म्हसळा तालुका शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या नीटनेटक्या आयोजनात म्हसळा तालुका तहसिल महसूल विभागा मार्फत धान्य वितरण व्यवस्थेत ऑनलाईन पद्धतीने जिल्ह्यात एक नंबरचे काम केले आहे तर माझी वसुंधरा योजने अंतर्गत स्वच्छतेत म्हसळा नगर पंचायतीने राज्य शासनाकडून बक्षिस मिळविले आहे त्यांनी केलेल्या कामाचे जाहीर कौतुक केले.कार्यक्रमाचे सुरवातीला तहसिल विभागाचे अधिकारी सचिन धोंडगे यांनी सुरेल आवाजात महाराष्ट्र गीत तर सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी भीमराव सूर्यतळ यांनी शासन योजनेवर गीताची रचना करून ते कणखर आवाजत गायन करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

कार्यक्रमाचे आयोजनात मदत व्यवस्था करण्यासाठी एनएनएस विध्यार्थी आणि आपदाचे व्यवस्थापकांचे
सहकार्य लाभले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!