डॉक्टर अतुल भोसले यांच्या पुढाकाराने’आयुष्यमान भारत’ व वयोश्री मुख्यमंत्री योजनेची मोफत नोंदणी चे कराडमध्ये आयोजन
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते
कराड :प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे कराड – दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले, यांच्या पुढाकारणे ‘आयुष्यमान भारत’ व वयोश्री मुख्यमंत्री योजनेची मोफत नोंदणी मंगळवार पेठ कमळेश्वर संत सखुबाई मंदिरामध्ये मोठया धडाक्यात संपन्न झाली.या कार्यक्रमाल कराड शहरातील सर्वसामान्य तरुण-तरुणी महिला – पुरुष जेष्ठ – नागरिकांनी योजनेच्या मिळणाऱ्या लाभांमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.तसेच रवीराज शिंदे, आणि एलजी ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांचे स्थानिक नागरिकांनी भरभरून कौतुक याप्रसंगी केले आहे.. आणि या कार्यक्रमाला मोठया प्रमाणात प्रतिसादही दिला आहे
यावेळी बोलताना एलजी ग्रुपचे रविराज शिंदे,पुढे म्हणाले ‘आयुष्यमान भारत’ कार्ड काढणाऱ्या व्यक्तींना पाच लाखापर्यंत उपचार मोफत मिळतात. राज्यातील सहा विभागात नऊ कोटी 64 लाख 78 हजार 550 पात्र नागरिकांपैकी 3 डिसेंबर पर्यंत राज्यात दोन कोटी 90 लाख 61हजार 624 नागरिकांनी ‘आयुष्यमान भारत’ कार्ड काढले आहे. आघाप सहा कोटी 74 लाख सहा हजार 926 नागरिकांनी कार्ड काढलेली नाहीत.यात सर्वाधिक कार्ड पुणे विभागातून काढलेली आहेत. पुणे विभागाला एक कोटी 96 लाख 17 हजार 752 नागरिकांची उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे.यामुळे पुणे विभाग अंतर्गत येणाऱ्या सातारा जिल्ह्यात. कराड – दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले, यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार पेठ एलजी ग्रुपने हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कराड शहर व ग्रामीण भागातील जनतेच्या तळागळापर्यंत ही योजना पोहोचवण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच ही योजना सर्वसामान्य गोरगरिबांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहे. ‘आयुष्यमान भारत’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांची महत्वकांक्षी योजना आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना या एकच आहेत. समाजातील शेवटचे माणसांपर्यंत दर्जेदार व उत्तम आरोग्य योजना पोहोचवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेमध्ये 356 प्रकारांच्या आजारावर मोफत उपचार केले जातात.असे ते बोलत होते.
या कार्यक्रमावेळी एलजी ग्रुपचे कार्यकर्ते संजय कांबळे, संदीप जोशी,किरण इनामदार, अरुण तेली,पंकज पावसकर,विशाल साळुंखे,गणेश पवार,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.