सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या तत्कालीन शिक्षण आधिकार्यांचा “भोंगळ” कारभार चव्हाट्यावर आल्याची चर्चा आहे. “आंधळ दळतंय, कुत्रं पिठ खातंय” अशी काहीशी परिस्थिती झाली असून ज्ञानदानाचे काम करणारे “गुरूजीच” सेवानिवृत्तीपर्यंत अप्रशिक्षीत असल्याचं उघडकीस आले आहे.* *या गुरूजींना शेवटच्या ५२ महिन्याच्या पगारापोटी अंदाजे तीस ते पस्तीस लाख रूपये गुरूजींच्या खिशात विसावले आहेत. जाधव यांचे हे प्रकरण गुंतागुंतीचे असून कामात हयगय करणारे कर्मचारी, तत्कालीन गटशिक्षणाधिकारी, तत्कालीन प्राथमिक शिक्षण आधिकार्यांवर कारवाई काय केली जाणार की, हे प्रकरण पुन्हा “लालफितीत” गुंडाळून ठेवले* जाणार ? याबाबत जिल्हा परिषदेच्या वर्तुळात उलट-सूलट चर्चेला उधाण आले आहे.
*याबाबत जिल्हा परिषदेत दबक्या आवाजात सुरू असलेल्या चर्चेचा मागोवा घेतला असता धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. 1984 -85 साली शासनाच्या आदेशानुसार डी. एड. शिक्षण पूर्ण नसताना देखील काही सुशिक्षितांना शिक्षक म्हणून जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक विभागात सेवेत घेतले गेले. या शिक्षकांना बालकांच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा आधिकार अधिनियम 2009 मधील कलम 23 नुसार सर्व अप्रशिक्षीत शिक्षकांना डी. एड. प्रशिक्षण त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून जास्तीत जास्त 3 वर्षे किंवा कमाल दिनांक 28 फेब्रुवारी 2019 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावे हे* *बंधनकारक करण्यात आले होते. तोपर्यंत त्यांची सेवा संपूष्ठात आणू नये अशा पध्दतीचा अध्यादेश शासनाने काढला होता. सेवा मिळालेवर अनेक शिक्षकांनी प्रशिक्षण पूर्ण केले पण जे अधिकाऱ्यांच्या मर्जीतले, वशिल्याचे त्यांनी आदेशालाच केराची टोपली दाखवल्याचे उघडकीस आले आहे.*
जे शिक्षक प्रशिक्षण पूर्ण करणार नाहीत त्यांची सेवा 28 फेब्रुवारी 2019 नंतर आपोआपच संपूष्ठात येईल अशा शिक्षकांना हा कालावधी अंतिम राहिल अशा ही कडक सुचना त्यावेळी शासनाकडून देण्यात आल्या होत्या.*
सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा भांबवली येथील शिक्षक हरिबा राजाराम जाधव हे मे 2023 मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांची प्राथमिक शिक्षक म्हणून सुमारे 33 ते 35 वर्षांची सेवा झाल्याची प्राथमिक चर्चा आहे. सेवा निवृत्तीची कागदपत्रे तपासत असताना जाधव यांनी 2019 पर्यंत प्रशिक्षीत नसल्याची धक्कादायक बाब सेवानिवृत्तीच्यावेळी समोर आल्याने सातारा पंचायत समीतीचे कर्मचारी, आधिकारी, गटशिक्षणाधिकारी चक्रावून गेले. यानंतर कोणत्या कोणत्या आधिकारी आणि कर्मचार्यांने जाधव यांना 3 वर्षे प्रशिक्षण नसताना पाठीशी घातले गेले याची जंत्रीच बाहरे निघाली.*
या कालावधीत एल.वाय.खामकर,एल.सी.चित्रागार, ए.एस.आगुंडे, एस.डी.पालसांडे, पी.एस.कर्वे, यांनी वरिष्ठ लिपीक व सहाय्यक म्हणून काम पाहिले असून रमेश लोटेकर, श्रीमती उज्वला कुलकर्णी हे केंद्र प्रमुख होते. श्रीमंती जयश्री शिंगाडे विस्तार आधिकारी तर पंचायत समिती मध्ये वादग्रस्त म्हणून चर्चेत आलेले* *गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांच्याच कालखंडात हरिबा जाधव या मुख्याध्यापकास 52 महिन्यांचा अंदाजे 30 ते 35 लाखाचा पगार दिला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याची चर्चा सातारा पंचायत समितीच्या वर्तुळात आहे.*
जाधव याचे प्रशिक्षण नसल्याने नोकरी करण्यास अपात्र असताना जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग आणि पंचायत समीतीचे गटशिक्षणाधिकारी यांनी कोणतीच कागदपत्रे न तपासता 3 वर्षे पगार दिलाच कसा हा संशोधनाचा विषय आहे. जिल्हा परिषदेच्या कोषागार कार्यालयाच्या डोळ्यात धुळफेक करून किंवा जाधव यांना पाठीशी घालून 3 वर्षांचा पगार दिला गेला का ? याबाबत उलट -सुलट चर्चा केली जात आहे.*
विशेष म्हणजे प्रशिक्षण पूर्ण नसताना जाधव यांना मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती देताना पात्र अपात्रतेबाबतची कागदपत्रे का तपासली गेली नाहीत ? दरवर्षी 1 जुलैला शासकिय कर्मचार्यांना 3 टक्के वेतन वाढ दिली जाते., या 3 वर्षांच्या कालखंडात हरिबा जाधव अप्रशिक्षीत असताना वेतन वाढ दिली गेलीच कशी ?वेतन वाढ देताना तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी, आणि जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकार्यांनी जाधव यांना वेतनवाढ दिलीच कशी ? जिल्हा परिषदेच्या कोषागार कार्यालयाने या सर्व बाबींकडे दुर्लक्ष कसा काय केला ? याबाबत उलट सूलट चर्चा आहे.*
हरिबा जाधव यांना सन 28 फेब्रुवारी 19 ते मे 2023 या कालावधीत दिलेल्या सुमारे ५२ महिण्याचा अंदाजे तीस ते पस्तीस लाखाचा पगार दिला गेलाच कसा ? सर्व प्रशासकीय यंत्रणेला जाधव यांच्याबाबत माहित असताना “अक्षम्य” दुर्लक्ष झाले की याबाबीकडे जाणीवपूर्वक “कानाडोळा” केला याची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे.
जाधव यांच्या बाबत जे कथित प्रकरण चर्चेत आहे त्याची चौकशी होऊन ही जबाबदारी कोणावर टाकली जाणार याची वसुली कशा पध्दतीने केली जाणार या गंभीर घटनेची चौकशी केली जाणार का? या बाबत उलट सुलट चर्चा सध्या जिल्हा परिषदेमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.*
*हरिबा जाधव हे अप्रशिक्षीत शिक्षक यांची सेवा 28 फेब्रुवारी 2019 ला संपुष्ठात आणणे आवश्यक होते. जाधव यांची सेवा संपुष्ठात आणण्याचा आधिकार सातारा पंचायत समीतीचे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांचेवर नाही असे शासनाचे आदेशावरून स्पष्ट दिसून येत आहे याचा अर्थ सेवा संपूष्टात आणणे ही जबाबदारी तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी पार पाडायला हवी होती. हरिबा जाधव यांना 2019 साली सेवेतुन मुक्त करणे गरजेचे असताना त्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी त्यांना पाठीशी का घातले ? तीन वर्ष जाधव अप्रशिक्षीत असताना पगार कसा दिला गेला त्याची वसूली निघाल्यास ती कशी वसूल केला जाणार का ? तीन वर्ष खोट्या कागदपत्राच्या आधारावर नोकरी आणि पगार दिला* *याची जबाबदारी कोण घेणार ? जाधव यांनी पेन्शन आणि अन्य देयकाबाबत* न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यास जिल्हा परिषदेचा वेळ आणि पैशाची “बरबादी” होणार याची चौकशी करून ज्यांनी कामात हयगय केली त्यांच्यावर कारवाई केली जाणार का ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित आहेत. शिस्तप्रिय आणि स्पष्टवक्ते* *मुख्यकार्यकारी आधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांची ख्याती आहे. जे प्रामाणिकपणे काम करतात त्यांच्या पाठीवर थाप, मात्र कामचुकारांना त्यांची जागा दाखवून देणारे मुख्यकार्यकारी अधिकारी खिलारी हे मुख्याध्यापक जाधव यांच्या प्रकरणात ज्या-ज्या आधिकारी कर्मचार्यांकडून कामात कायदा* *बासनात “गुंडाळला” त्यांना निलंबित करून कारवाई करणार का ? हा सगळाच प्रकार गुंतागुंतीचा झाला असून जि. प. च्या वर्तुळात दबक्या चर्चेला उधाण आले आहे. जि. प. माध्यमिक शिक्षण विभागातील भ्रष्टाचारावर अधिवेशनात आ. महेश शिंदे यांनी उठवलेला १५० कोटी भ्रष्टाचाराचा आवाज “दाबला” गेल्याची चर्चा आहे.* *या प्रकरणात संबंधितांवर दोषींवर कारवाई केली जाईल की, हे प्रकरण पुन्हा लालफितीत गुंडाळले जाईल याबाबत उलट-सुलट चर्चा आहे.*
टिप
याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी चौकशी समिती नियुक्त केली असल्याचे समजते