दहिवडी ईदगा मैदान या ठिकाणी दुष्काळाचे सावट हटवून पाऊस पडावा यासाठी मुस्लिम समाजाच्या वतीने नमाज पठन

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
दहिवडी 

दहिवडी ईदगा मैदान या ठिकाणी दुष्काळाचे सावट हटवून पाऊस पडावा यासाठी मुस्लिम समाजाच्या वतीने नमाज अदा करण्यात आली. यावेळी मुस्लिम समाज बहुसंख्येने उपस्थित होता इस्लाम धर्मीयांच्या मान्यतेनुसार जेव्हा कधी पाऊस लांबणीवर पडतो किंवा दुष्काळाची चिन्ह दिसू लागतात तेव्हा विशेष नमाज पठणाची संकल्पना इस्लाम धर्मामध्ये आहे. त्याप्रमाणे सध्या महाराष्ट्रात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीला थांबवण्यासाठी व पावसाचे आगमन व्हावे यासाठी दहिवडी येथील मुस्लिम बांधवांकडून विशेष नमाज पठनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दहिवडी येथील आबालवृद्ध मुस्लिम मोठ्या संख्येने जमा झाले होते. नमाज पठनानंतर सामूहिक प्रार्थना घेऊन अल्ला तालाला दुवा मागण्यात आली व दुष्काळी परिस्थिती संपून सुकाळ यावा व भरभराटीचे जीवन अखंड मानव जातीला उपभोक्ता याव याविषयी दुवा करण्यात आली.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!