श्रीमती वेणुताई रसाळ यांचा  सन्मानपत्र देवुन प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांचेकडून गौरव

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )

म्हसवड प्रतिनिधी :

राज्यभरात सध्या सर्वत्रच महसुल सप्ताह सुरु असुन यानिमीत्त महसुल विभागाने दररोज एक उपक्रम हाती घेतला आहे, यानिमीत्त शासनाच्या विविध कल्याणकारी योजना नागरीकांच्या पर्यंत पोहचवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असुन याचाच एक भाग म्हणुन स्वातंत्र्य सैनिक अथवा त्यांच्या पत्नीचा गौरव केला जात आहे, म्हसवड शहरातील दिवंगत जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी हरि गोविंद रसाळ यांच्या पत्नी श्रीमती वेणुताई रसाळ यांचा  सन्मानपत्र देवुन माण – खटावच्या प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांनी गौरव केला.

यावेळी म्हसवड चे मंडलाधिकारी शेंडे, गावकामगार तलाठी उत्तम आखडमल, अरुण सावंत, राजेश रसाळ माजी नगरसेविका रंजना रसाळ आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकारी गाडेकर म्हणाल्या की राज्यात सध्या महसुल सप्ताह सुरु असुन यानिमीत्त आज म्हसवड येथील दिवंगत जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी हरि गोविंद रसाळ यांच्या पत्नी चा प्रशासनाच्या वतीने गौरव होत आहे मला याचा अभिमान वाटतो आहे की हा गौरव माझ्या हस्ते होत आहे, यानिमीत्त प्रशासन नागरीकांच्या दारी जावुन शासनाच्या कल्याणकारी योजनेचा लाभ सर्वसामान्य नागरीकांना मिळवुन देणार आहे, यामध्ये नागरीकांचे विविध दाखले, शिधापत्रीका यासह ७/१२ यासारखी कामे तात्काळ केली जाणार आहेत, याशिवाय एखाद्या गावाने जर आमच्याकडे प्रस्ताव दिला तर त्या गावात अशा प्रकारच्या कँपचे आयोजन ही केले जाणार असल्याची माहिती यावेळी प्रांताधिकारी गाडेकर यांनी दिली. तर म्हसवड येथील कैलासवासी जेष्ठ क्रांतिकारी हरि गोविंद रसाळ यांच्याविषयी बोलताना प्रांताधिकारी गाडेकर म्हणाल्या की माण तालुक्यात म्हसवड, शिरवली, दहिवडी, व बिदाल आदी ठिकाणी ४ स्वातंत्र्य सैनिक ( क्रांतिकारी ) होते त्या सर्वांच्या नातेवाईकांचा आज प्रशासनाच्या वतीने गौरव होत आहे, म्हसवड चे जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी हरि गोविंद रसाळ यांनी स्वातंत्र्य पुर्व काळात डॉ. सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत महत्वाची भुमिका बजावली होती त्यांच्या पत्नी श्रीमती वेणुताई रसाळ यांनीही त्या लढ्यात सहभाग घेतला होता, आज त्यांचे वय हे नव्वदीपार असले तरी ही त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. त्यांचा या वयातही उत्साह पाहुन आम्हालाही नवीन उर्जा मिळाली असल्याचे शेवटी गाडेकर यांनी सांगितले.

 

चौकट

शासनाने जागा द्यावी – श्रीमती रसाळ –

स्वातंत्र्य सैनिकांना शासन ठिकठिकाणी जागा उपलब्ध करुन देत आहे, तशी ती आम्हालाही उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी श्रीमती वेणुताई रसाळ यांनी प्रांताधिकारी गाडेकर यांच्याकडे करीत त्या जागेवर क्रांतिकारी हरि गोविंद रसाळ यांचे स्मारक उभारण्याचे आपले स्वप्न असल्याचेही त्यांनी सांगितले, तर हे स्मारक भावी पिढीसाठी प्रेरणादाई ठरेल असे ही श्रीमती रसाळ यांनी यावेळी स्पष्ट केले. 

 

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!