म्हसवड पालिकेतील प्रशासकीय कार्यकाळात सुरु असलेला भोंगळ कारभार व भ्रष्टाचार याची सखोल चौकशी व्हावी :विजय धट
व्हिजन २४ तास न्युज ( संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
विजय धट, माजी नगराध्यक्ष, म्हसवड.यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देऊन म्हसवड पालिकेतील प्रशासकीय कार्यकाळात सुरु असलेला भोंगळ कारभार व भ्रष्टाचार निदर्शनास आणून देऊन सदर अर्जामध्ये नमुद केलेल्या प्रत्येक मुद्दयांची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना दिलेल्या निवेदनात विजय रामचंद्र धट, माजी नगराध्यक्ष, म्हसवड नगरपरिषद म्हसवड. चिटणीस भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा.यांनी अर्जाद्वारे विनंती केली आहे की मी म्हसवड शहरातील वरील पदाधिकारी व एक जबाबदार व्यक्ती असुन मी आपणाल्या म्हसवड पालिकेतील प्रशासकीय कार्यकाळात सुरु असलेला भोंगळ कारभार व भ्रष्टाचार निदर्शनास आणु इच्छितो आपण सदर अर्जामध्ये नमुद केलेल्या प्रत्येक मुद्दयांची सखोल चौकशी कराल व योग्य ती कारवाई कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
म्हसवड नगरपरिषदेमध्ये गत ३ वर्षापासुन प्रशासकीय राजवट सुरु असुन प्रशासन अधिकारी म्हणुन डॉ. सचिन माने हे काम पहात आहेत. पालिकेत सध्या फक्त प्रशासकीय राजवट सुरु अस ल्याने मुख्याधिकारी डॉ. माने यांचा पालिकेत मनमानी कारभार सुरु आहे. आमचे नेते माण – खटावचे आ. जयकुमार गोरे यांच्या माध्यमातुन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे. या निधीतुन शहरातील पाणी पुरवठा योजना नव्याने कार्यान्वित करणे, शहरातील रास्ते दुरुस्ती करणे, शहरातील जलस्तोत्रांवर फिल्टर बसवणे, शहर सुशोभिकरण करणे, यासह अन्य विविध विकासकामांचे नियोजन आहे. या नियोजनापैकी शहरात काही विकासकामांना प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आलेली आहे, मात्र त्या कामांचा दर्जा हा अतिशय सुमार असा आहे, वास्तविक जो निधी मंजुर झालेला आहे ती विकासकामे ही शहराला नवीन ओळख निर्माण करुन देणारी ठरणारी अशी आहेत, मात्र मुख्याधिकारी माने यांना त्याच्याशी काहीही देणघेणं नाही असे दिसत असुन ते ही कामे कशीही करा मला मात्र माझा वाटा द्या असे ठेकेदारांना म्हणत असल्यानेच विकासकामांचा दर्जा खुप ढासळलेला दिसुन येत आहे. पालिकेत सध्या मुख्याधिकारी हेच सर्वेसर्वा असल्याने ते आपल्या मर्जीतील ठेकेदारांना कामे देत आहेत, त्यामुळे त्यांच्याभोवती नेहमीच ठेकेदारांचा गराडा पडलेला दिसुन येतो, शहरात सध्या सुरु असलेल्या कामांचा दर्जा पाहुन तीव्र संताप येत आहे., मंजुर असलेली विकासकामे ही दर्जेदार करण्याची जबाबदारी ही प्रशासनाची असते. मात्र येथे मुख्याधिकारी हे आपली जबाबदारीच विसरले असल्याचे दिसुन येते.
पालिकेच्या माध्यमातुन जी विकासकामे सुरु आहेत त्या प्रत्येक कामांमध्ये मुख्याधिकारी हे स्वत: पार्टनर आहेत, अथवा त्यातुन त्यांनी गलेलठ्ठ कमीशन हाडपले आहे हे मी आपणाला अत्यंत जबाबदारीने सांगतो. पालिकेत सध्या मुख्याधिकारी हे बोगस बीले काढुन शासनाचीही मोठी फसवणुक करीत आहेत. शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी आमचे नेते आ. गोरे यांनी ८० कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाच्या माध्यमातुन आणला आहे त्या कामाचे तर अक्षरशा तीन तेरा मुख्याधिकार्यांनी वाजवले आहेत. सदर योजनेचे काम करताना खरे तर शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जल वाहिनी बदलणे गरजेचे असताना मुख्याधिकार्यांनी तसे न करता मुख्य जलवाहिनीला जोडल्या जाणाऱ्या अंतर्गत जलवाहिन्या बदलण्याच्या झपाटा लावला आहे त्यामुळे शहरातील सर्व रस्ते खोदण्यात आले आहेत यामुळे शहराचे विद्रुपीकरणाचे काम सुरु असल्याचे भासते. वास्तविक शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी बदलली असती तर शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला नसता. आज मुख्याधिकाऱ्यांच्या या आडमुठ्या धोरणामुळे शहराला १५ दिवसांतुन एकवेळ पाणी पुरवठा होत आहे याला फक्त मुख्याधिकारी हेच जबाबदार आहेत. पालिकेच्या माध्यमातुन शहराच्या स्वच्छतेसाठी जो ठेका देण्यात आलेला आहे त्यामध्येही मोठा भ्रष्टाचार सुरु आहे, वास्तविक सध्या ज्या कंपनीच्या साह्याने शहर स्वच्छता केली जात आहे त्या कंपनीला याकामी देण्यात आलेली ठेका रक्कम ही अवाच्या सवा आहे. या कंपनीपेक्षाही अर्ध्या रकमेत दुसरी कंपनी हे काम करण्यास तयार असताना मुख्याधिकारी हे केवळ सदर ची कंपनी आपणाला हवे तेवढे कमीशन देत असल्यानेच दुसर्या कंपनीचा विचार करीत नाहीत यातुन त्यांना दरमहा लाखो रुपये हे कमीशन स्वरुपात मिळत आहे, हीच स्थिती पालिकेतील कंत्राटी कर्मचारी पुरवण्याच्या ठेकेकामीही आहे.. शहरातील पथदिवे बदलणेकामीही मोठा आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे त्याचीही चौकशी होणे अपेक्षित आहे.
वास्तविक म्हसवड पालिका हे सध्या अधिकार्यांना पैसे खाण्याचे कुरण वाटत असल्याने मुख्याधिकारी हे या कुरणात आपल्या मर्जीप्रमाणे चरण्याचे काम करीत आहेत त्यांना ना कोणी रोखणारे ना कोणी टोकणारे असल्यानेच त्यांचा हा सर्वच क्षेत्रात मुक्त संचार सुरु आहे. या साहेबांची त्यांचा कार्यकाल पुर्ण झाल्यावर त्यांची प्रमोशनवर भिवंडी येथील महापालिकेत उपायुक्त म्हणुन बदली झालेली आहे, असे असताना महोदयांनी तेथे प्रमोशनवर हजर रहात काही दिवस तेथील पदभार स्विकारला तद्नंतर ते पुन्हा म्हसवड पालिकेत रुजु झालेले आहेत. याचाच अर्थ ते पगार भिवंडी महापालिकेचा घेतात तर कमीशन म्हसवड पालिकेत खातात असे चित्र सध्या सुरु आहे.मात्र मी त्यांचा हा सुरु असलेला भोंगळ कारभार पाहु शकत नाही माझ्या म्हसवड नगरी ची होत असलेली आर्थिक लुट आम्ही पाहु शकत नाही त्यामुळेच मुख्याधिकार्यांच्या या मनमानीला लगाम बसावा व सर्व विकासकामे नियमाप्रमाणे व्हावीत हीच माझी अपेक्षा आहे अन् या अपेक्षापुर्तीसाठीच मी दि. २० फेब्रुवारी पासुन पालिका मुख्याधिकार्यांच्या विरोधात म्हसवड पालिकेसमोर मोठ्या प्रमाणावर म्हसवडकर जनतेला सोबत घेवुन जनआंदोलन उभारणार असल्याचेही विजय धट यांनी निवेदनात म्हटले आहे