चालु वर्षी म्हसळा तालुक्यात शेतीला पूरक असे पाऊस पडत आहे.आता पर्यंत तालुक्यात २७०० मिमी पावसाची नोंद झाली आहे.मागिल चार दिवस तो धो- धो कोसळत आसल्याने पाणथळ भात शेतीचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे.
संततधार पावसामुळे अंतिम टप्प्यात आलेली भात लावणीची कामे थोड्या विलंबाने होत आहेत. म्हसळा तालुक्यात खाडी विभागात शेतात पाणी जास्त प्रमाणात असल्यामुळे भात लावणीचे १० ते २० टक्के काम बाकी आहे. दिनांक २२ ते २५ जुलै रोजी म्हसळा तालुक्यात पावसाचे पाण्याने झोडपून काढले असल्याने त्याचा परिणाम लावणी केलेल्या भात शेतीवर झाला आहे.सातत्याने भाताचे आवण पाण्यात राहिल्याने आवन लागवडीस अयोग्य झाले आहे तर काही ठिकाणी लागवड केलेली शेती वाहुन गेली आहे.
दिनांक २६ जुलै रोजी पावसाने विश्रांती घेतली असता राज्याचा महीला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हसळा तालुका नुकसानग्रस्त काळसुरी खाडी विभागात पाहणी केली असता त्या शेताच्या बांधावर उतरून शेतकऱ्यांचे शेतीची माहिती घेतली.अतिवष्टीमुळे म्हसळा तालुक्यात शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले असल्यास कृषि विभागाने योग्य तो पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या वेळी त्यांचे समावेत तहसीलदार समीर घारे, गटविकास अधिकारी माधव जाधव, माजी सभापती महादेव पाटील,तालुका अध्यक्ष समीर बनकर, कृषि विभागाचे पर्यवेक्षक सूजय कुसाळकर आणि शेतकरी उपस्थित होते.