म्हसवड पोलीस स्टेशन रस्त्याची लागलीय वाट…, सर्वच पुढाऱ्यांनी त्याकडे फिरवलीय पाठ.

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड.. प्रतिनिधी
          म्हसवड शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या  म्हसवड चांदणी चौक ते पोलीस स्टेशन दरम्यानच्या  रस्त्याची अक्षरशः वाट लागली असून या रस्त्याकडे सर्वच राजकीय पक्षातील पुढाऱ्यांनी पाट फिरवल्याचे दिसून येत आहे.
       म्हसवड चांदणी चौक ते शिक्षक कॉलनी दरम्यान चा एक किलोमीटर रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत खराब झाला आहे. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा ही अवस्था चांदणी चौक ते म्हसवड पोलीस स्टेशन दरम्यान झालेली आहे. म्हसवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी कार्यालयात बसून प्रशासनाचा गाडा चालवतात.

     नगरपालिका स्थानिक रहिवाशाकडून अनेक प्रकार चे कर वसूल करते मात्र त्यांना रहिवाशांच्या मूलभूत सोई सुविधांची जाण आहे की नाही ? हा प्रश्न जनतेकडून विचारला जात आहे. खरं तर कार्यालय सोडून शहरात फेरफटका मारला तरच जनतेच्या अडचणी मुख्याधिकाऱ्यांच्या लक्षात येतील ही वस्तुस्थिती आहे.
      चांदणी चौक ते म्हसवड पोलीस स्टेशन दरम्यानच्या रस्त्याची अक्षरशः वाट लागली असून स्थानिक रहिवाशांचा जीव मेटाकुटीला आलेला आहे. सध्या पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणी रस्त्यावर पाण्याची डबकी तयार झालेली आहेत. या ठिकाणी वाहन चालवणे कसरतीचे होऊन बसले आहे. सदर ठिकाणच्या रस्त्या वरील खड्ड्या तील गढूळ चिखल युक्त पाणी वाहनामुळे प्रवाशांच्या अंगावर उडाल्याच्या अनेक तक्रारी होत आहेत. स्थानिक रहिवासी व वाहनधारक या खराब रस्त्यामुळे त्रस्त झालेले दिसून येत आहेत. सदर रस्त्याचे काम आठ महिन्यापूर्वी मंजूर असल्याचे नगरपालिकेने जाहीर केले मात्र आजवरच्या कालावधीत सदर ठिकाणचा एक खड्डे सुद्धा भरलेला नाही ही वस्तुस्थिती आहे.

      हा रस्ता म्हसवड शहरांमध्ये वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असून शाळा कॉलेजमधील हजारो विद्यार्थी व इतर हजारो प्रवासी, वाहनधारक या रस्त्यावरून दिवसभरात ये जा करतात, तसेच म्हसवड पोलीस स्टाफ, तसेच पोलीस स्टेशनमध्ये कार्यालयीन कामासाठी जाणाऱ्यांना सुद्धा या ठिकाणच्या चिखल व पाणथळ रस्त्याचा फटका बसत आहे. सदर रस्ता मंजूर आहे तसेच पावसाळा आहे इत्यादी कारणे सांगण्यापेक्षा म्हसवड नगरपालिकेने या रस्त्याचे लगेच डांबरीकरण राहिले मात्र मुरमीकरण व बीबीएम चे काम तातडीने करावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर यांनी केली आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!