सत्ता नसताना कोट्यवधी रुपयांची विकासकामे मग पालिकेत पुन्हा सत्ता आल्यावर म्हसवड शहर विकासाच्या बाबतीत रोलमॉडेलच आ. जयकुमार गोरे : मासाळवाडीत विविध विकासकामांचे लोकार्पण

बातमी Share करा:

म्हसवड : गेल्या पाच वर्षांत म्हसवड पालिकेची सत्ता हाती नसतानाही शहरासह मासाळवाडी येथे विविध विकासकामे साकारली आहेत.  सत्ता नसताना कोट्यवधी रुपयांची विकासकामे मंजूर केली आहेत. पालिकेत पुन्हा सत्ता आल्यावर म्हसवड शहर विकासाच्या बाबतीत रोलमॉडेल  झाल्याशिवाय राहणार नाही असा आशावाद आ.जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.
मासाळवाडी (म्हसवड) येथील विविध विकास कामाच्या  लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्याधिकारी डॉ. सचिन माने,भाजपा (ओबीसी युवा मोर्चा) महाराष्ट्र राज्य  प्रदेशाध्यक्ष करण पोरे     भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे , माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, विजय घट, सुरेश म्हेत्रे, नितीन दोशी,डॉ. वसंत मासाळ, धनाजी माने  शशिकांत गायकवाड, सिध्दार्थ गुंडगे, नारायण मासाळ, सुखदेव मासाळ, लक्ष्मण कोडलकर, बी. एम. अबदागिरे, जगन्नाथ लोखंडे व मान्यवर उपस्थित होते
यावेळी आ. गोरे म्हणाले, पाच वर्षापूर्वी म्हसवडकरांनी पालिकेची सत्ता फसवी आश्वासने देणाऱ्या लोकांच्या हाती दिली. त्यांना विकास म्हणजे काय? तो कसा करतात? त्यासाठी निधी कसा आणि कुठून  आणायचा? विकास कामामुळेच शहराची व जनतेची कशी प्रगती होते. याबाबत त्यांना अभ्यास नव्हता. त्यांच्यामुळे गेल्या पाच वर्षांत म्हसवडशहराचे मोठे नुकसान झाले. झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी आता
सामान्य म्हसवडकरच सज्ज आहे.. आ. गोरे म्हणाले, जेव्हा पालिकेची सत्ता जनतेने आम्हाला दिली त्यावेळच्या सत्ताकाळात म्हसवड शहराचा जो विकास आम्ही केला तेवढाच विकास आज या शहरात दिसत आहे. नंतरच्या ५ वर्षात सांगण्यासारखे विकासाचे एकही काम शहरात झाले नाही. शहरासाठी जो विकासनिधी मंजुर करुन आणला तो निधीही सत्ताधाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे परत गेला आहे. आता त्यांची सत्ता संपुष्टात आली आहे. पालिकेत प्रशासक आहे. त्यांनी प्रशासनाला कामच करू दिले नाही. प्रशासक चांगल्या लोकांच्या सहकार्याने विकासकामे कशी करू शकतात, हे तुम्ही आता मासाळवाडीत झालेल्या विविध विकासकामातून  पहात आहात. येत्या काळात म्हसवड शहर विकासाचे रोल मॉडल बनवण्यासाठी लागेल तेवढा निधी आणला जाईल. या भागातील शेतीसाठी जिहे कठापूर योजनेचे काम येत्या १८ महिन्यांत पूर्ण करुन या योजनेचे पाणी येथील तलावात सोडण्याचे आश्वासनही आ. गोरे यांनी दिले. डॉ. वसंत मासाळ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी म्हसवड ते मासाळवाडी रस्ता डांबरीकरण, विरोबा मंदिर सभामंडप, वैकुंठधाम स्मशानभूमी, भाटकी चौक ते    मासाळवाडी पिण्याच्या पाण्याची   वितरण नलिका ट्रान्स्फार्मर आदी विकासकामांचे लोकार्पण केले..

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!