व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला)
गणेश तळेकर
मुंबई –प्रतिनिधी अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाच्या वतीने बसरूर स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जाणार आहे. हा दिवस स्वराज्याच्या पहिल्या आरमार प्रमुख अपराजित योद्धा मायनाक भंडारी यांच्या पराक्रमाची आठवण करून देणारा आहे.
मायनाक भंडारी यांनी आपल्या शौर्याने बसरूर येथे पोर्तुगीजांवर निर्णायक विजय मिळवला, ज्यामुळे पोर्तुगीज पुन्हा कधीही बसरूरमध्ये परत येऊ शकले नाहीत. त्यांच्या या अजरामर पराक्रमाच्या स्मरणार्थ 13 फेब्रुवारी हा दिवस बसरूर स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो.
या निमित्ताने आज संध्याकाळी 6.30 वाजता शिवाजी पार्क येथील नागरी संघात एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला भंडारी समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे श्री. नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी केले आहे.