महाविकास आघाडीने महाराष्ट्रात महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ २४ ऑगस्ट २०२४ रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. मात्र, काही कारणास्तव हा बंद मागे घेण्यात आला. बंद मागे घेण्याचा निर्णय जरी झाला असला, तरी आंदोलनाची तीव्रता कमी न करता महाविकास आघाडीने काळ्या पट्ट्या बांधून सरकारचा तीव्र निषेध केला.
म्हसवड येथे या आंदोलनासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनावणे, जय राजेमाने,पूनम माने, सुप्रिया गुरव,शिवसेनेचे बाळासाहेन मदने, माजी नगराध्यक्ष महादेव मासाळ,शिवाजी केवटे,, सचिन माने,भीमराव लोखंडे,धनाजी शिंदे,सचिन लोखंडे,अरुण मंडले,चंद्रकांत केवटे,अशोक काळे,भाग्यश्री सोनवणे,, सिद्धी माने,संगीता सोनवणे, ई. कार्यकर्ते आणि महिला व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या आंदोलनादरम्यान महिलांनी तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून सरकारवर टीका केली आणि महिला सुरक्षेसाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केली.
या आंदोलनामध्ये महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी विविध संघटनांनी आणि महिला कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सरकारच्या धोरणांविरोधात आपला रोष व्यक्त केला.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना आरोप केला की, सध्याच्या सरकारने महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर गांभीर्याने पावले उचलली नाहीत. तसेच, महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी धोरणे राबविण्यात सरकार अपयशी ठरल्याचेही महाराष्ट्र मधील महिलांच्या वर होत चाललेल्या वाढत्या अत्याच्याराला आळा घालण्यात असमर्थ ठरलेल्या मुख्यमंत्री हे स्वताला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचे पाईक संबोधुन घेतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या धोरणाचा विसर पडलेला दिसतोय म्हणून महिलांवरील अत्याचार सातत्याने वाढ झाली असल्याचे दिसत आहे. मागिल एकाच महिण्यात मंदिरात तिन पुजाऱ्यांनी महिलेवर अत्याचार करून महिलेचा खून केला सातारा जिल्यातील माण तालुक्यातील शिंगणापूर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे बदलापूर मधील अल्पवयीन विद्यार्थीनिचा शोषण करण्यात आले त्याचा उद्रेक बदलापूरात झाला आहे. महिलांवर अत्याचार रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरत आहे. म्हणून मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी तात्काळ राजीनामा द्यावा या आंदोलनाद्वारे सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.
म्हसवड येथील हे आंदोलन शिस्तबद्ध आणि शांततामय वातावरणात पार पडले. उपस्थित महिलांनी आंदोलनादरम्यान एकजुटीचे प्रदर्शन करून महिला सुरक्षेसाठी ठोस पावले उचलण्याची गरज अधोरेखित केली.