*स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीत शरद पवार पंतप्रधान व्हावेत .- सादिक खाटीक*
व्हिजन २४ तास न्युज (संपादक अहमद मुल्ला )
सादिक खाटीक
आटपाडी : ( प्रतिनिधी )
स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीत, राज्य निर्मितीच्या पासष्टीत मराठी माणसाच्या रुपाने सर्वमान्य, सर्वप्रिय, सर्वस्पर्शी, सर्वोत्तम नेते शरद पवार पंतप्रधान व्हावेत. अशा भावना सादिक खाटीक यांनी व्यक्त केल्या .
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री, आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार एक तास राष्ट्रवादी साठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी ” या उपक्रमाच्या माध्यमातून आज आटपाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव सादिक खाटीक यांच्या निवासस्थानी गाव / प्रभाग भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . राज्यातल्या सतराव्या आणि आटपाडीतल्या चौदाव्या गाव – प्रभाग भेटीच्या बैठकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक यांनी या भावना व्यक्त केल्या .
प्रत्येक गाव, खेड्यातून होत असलेले स्थलांतर उद्योग व्यवसायांच्या माध्यमातून रोखले पाहिजे . उत्तम प्रतिचा, दर्जाचा माल खेडे, गाव आणि लहान शहरात मिळत असतानाही मोठ्या शहराकडे खरेदी साठी गावच्या पैसेवाल्यांचा वाढता ओढा स्थानिक अर्थव्यवस्थेला मारक आहे . त्या पैसेवाल्यांच्या मानसिकतेत बदल झाला पाहीजे . उत्तम प्रकारची लहान जनावरे खरेदीसाठी मुंबई कोकण सह, अर्धा महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आंध्रप्रदेश, तेलंगाना, केरळ, तामीळनाडू पर्यतचे व्यापारी आटपाडीत येतात . या पार्श्वभूमीवर मटनावर प्रक्रिया करणारी आणि एक्स्पोर्ट करता येईल व्यवस्था आटपाडीतच उभी राहीली पाहीजे . फळफळावळ, धान्ये भाजीपाला, कडधान्ये, इतर शेतमाल, तेलबिया, दुध, अंडी, यांच्या बाबतीत आधूनिकतेची जोड देत हे सर्व एक्स्पोर्ट करता येण्यापर्यत दर्जा व यंत्रणा वास्तवात आणली पाहीजे . खेड्यातल्या कुशलतेला साथ आणि दाद देणारी राष्ट्रवादी काँग्रेसची नेतेमंडळी असून त्यांच्या माध्यमातूनच खरी विकास पंढरी साकारू शकते असे प्रांजळ मत गदिमा हायस्कुल, वसंतराव दादा पाटील ज्युनियर कॉलेज माडगुळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक – प्राचार्य अशोक पाटील सर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले .
आधुनिक शेतीच्या माध्यमातून शेती उद्योगाला चालना देण्याच्या संकल्पना राबविल्या पाहीजेत . गटशेतीच्या माध्यमातून वाजवी दरात दर्जेदार बियाणे खते औषधे मिळविता येतील शिवाय विक्री व्यवस्थेच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळविता येईल . शेती हा भारतीय व्यवस्थेचा कणा असून ही व्यवस्था मजबूत झाल्यास देश सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहील . अशा भावना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा सौ अश्विनीताई कासार – अष्टेकर यांनी यावेळी व्यक्त केल्या .
दिवंगत राष्ट्रीय नेते यशवंतराव चव्हाण साहेब उपपंतप्रधान झाले . श्रीमती प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्या . तथापि स्वातंत्र्याच्या त्र्याहत्तरीत आणि महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या त्रेसष्टी पर्यत मराठी माणूस देशाचा पंतप्रधान बनू शकला नाही ही खंत आहे . शेतकरी, मजुर , महिला, कामगार , उपेक्षित, वंचित , अल्पसंख्याक, मागास अशा देशातील विविध घटकांसाठी समर्पित होणारे, चौफेर दुरदृष्टीचे, आदरणीय श्री . शरदचंद्रजी पवार साहेबां सारखे प्रगल्भ नेतृत्व भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यास, स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीतला, राज्य निर्मितीच्या पासष्टीतला महाराष्ट्राचा खरा गौरव ठरेल. देशाचे सर्वोत्तम नेते म्हणून सर्वच राजकीय पक्षात आदराचे स्थान असणारे शरद पवार साहेब मराठी माणसांची अस्मिता प्रेरणा आहेत . २०२४ च्या निवडणूकी नंतर शरद पवार साहेब पंतप्रधान झाल्यास मराठी माणसांचा महाराष्ट्राचा आणि शेतकरी, कष्टकरी जनतेचा खरा गौरव ठरेल, म्हणूनच पवार साहेब पंतप्रधान झाले पाहीजेत अशी रास्त भावना असल्याचे सादिक खाटीक यांनी स्पष्ट केले .
देशात आणि राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेत येण्याचे सध्याचे वातावरण आहे . राज्यातल्या महाविकास सरकारची मुख्यमंत्री पदाची धुरा माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांच्याकडेच येण्याची दाट शक्यता आहे . त्यांच्या नेतृत्वाला बळकटी येण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार निवडून येण्यासाठी कार्यकर्ते आणि जनता जनार्धनांनी सक्रीय व्हावे .
सादिक खाटीक पुढे बोलतांना म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बलीदान दिलेले हुतात्मे, अनंत यातना भोगलेले स्वातंत्र्यसेनानी, सर्व क्षेत्रातले स्वातंत्र्ययोध्ये यांना *भारतरत्न* ने गौरवावे . तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शहीद झालेले १०५ हुतात्मे, या लढ्यातील आघाडीची नेते मंडळी, शाहीर, संपादक , पत्रकार, संयुक्त महाराष्ट्रच्या लढ्यात हाल, अपेष्टा, यातना भोगलेले विविध क्षेत्रातले मान्यवरांना *महाराष्ट्र भुषण* ने गौरवीत *भारतरत्न आणि महाराष्ट्र भुषण* या सन्मानाची आणखी उंची वाढविण्याचे काम केंद्र आणि राज्य सरकारने करावे . स्वातंत्र्यसंग्राम अभ्यासिका, हुतात्मा झालेल्यांच्या नाव गाव यांच्या उल्लेखाचा शहीद गौरव फलक उभारणीच्या माध्यमातून लाखो स्वातंत्र्य सैनिकांचा, हजारो हुतात्म्यांच्या देशभक्तीचा प्रचंड वसा – वारसा नव्या पीढीला प्रेरक, उदबोधक, मार्गदर्शक ठरेल . स्वातंत्र्य लढ्याला ज्यांनी विरोध केला आणि इंग्रजांना ज्यांनी समर्थन दिले . असे तथाकथीत देशप्रेमीही यामुळे उघडे पडतील . त्यादृष्टीने केंद्र – राज्य सरकारने देशात – राज्यात सर्वत्र, *स्वातंत्र्य संग्राम अभ्यासिका , शहीद गौरव फलक* उभारणीसाठी तातडीने पावले टाकावीत .
व्यवसाय, उद्योग, रोजगारासाठी शहरांकडे धावणारे लोंढे गावातच थांबावेत . घुसमटलेल्या, गुदमरलेल्या शहरांनी मोकळा श्वास सोडावा . शहर वाशीयांचे जीवन आरोग्यदायी, सुसह्य व्हावे म्हणून खेडे – गाव आणि त्यांचा गावगाढा सर्वार्थाने समृद्ध होण्यासाठी उद्योग, व्यवसाय, दुध, अंडी, फळफळावळ, शेती मालांवर प्रक्रिया करणारी कारखानदारी गाव गाड्यातच उभारली जावी . प्रचंड प्रमाणात सौरउर्जा, पवनचक्क्या उभारून मोफत, सहजच उपलब्ध होणाऱ्या सुर्यप्रकाश आणि हवेला उपयोगात आणत, गावगाड्यांना आर्थिक सुबत्ता आणावी त्यामुळे शहरे मोकळा श्वास सोडतील, खेडे, गावे कोट्यावधींचे मालक बनतील आणि गावचा शहराकडे धावणारा लोंढा गावातच रोखला जाईल . यासाठीचे नवे धोरण तातडीने अंमलात आणले पाहीजे . असे ही सादिक खाटीक यांनी शेवटी स्पष्ट केले .
प्रारंभी स्वागत प्रास्तावीक रियाज शेख यांनी केले, विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली . यावेळी दिलावर शेख, शंकरराव उर्फ आबासाहेब हाके, असिफ उर्फ बाबु खाटीक, अमीर खाटीक, रियाज शेख, बाळासाहेब ढगे, रॉमी शेख, इरफान शेख, शब्बीर मुलाणी संजय चव्हाण, दीपक चव्हाण, सौ . रेश्मा हाके – बंडगर, सौ . गोकुळा शंकरराव हाके, श्रीमती रशिदाबी खाटीक, श्रीमती शाबेरा बेपारी, सौ . नसिमा शेख, सौ . शमा खाटीक, श्रीमती पारुमावशी जाधव, सौ . राबियाँबसरी खाटीक, सौ . इशरतजहाँ खाटीक इत्यादी अनेक जण उपस्थित होते . शेवटी असिफ उर्फ बाबू खाटीक यांनी आभार मानले .