पुणे बेंगलोर राष्ट्रीय तासावडे तालुका कराड येथील स्थानिक वाहनधारकांची टोल वसुली होत असल्यामुळे टोल वरील वातावरण चिगळले होते यासंदर्भात कराड येथील सर्किट हाऊस मध्ये महामार्ग टोल नाका प्राधिकरण व्यवस्थापन यांच्यामध्ये संयुक्त बैठक झाली विविध गावचे ग्रामपंचायत पदाधिकारी वाहनधारक नागरिक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते
यावेळी गेले वीस वर्ष टोल माफी होती नवीन व्यवस्थापाने आमच्याकडून टोल घेण्यास सुरुवात केली आहे रस्ता रुंदीकरणावेळी आमच्या जमिनी गेल्या आहेत आमचे व्यवसाय उध्वस्त झाले आहेत त्यामुळे आम्हाला कायमस्वरूपी टोलमुक्ती द्यावी या मागणीवर ग्रामस्थ व स्थानिक वाहनधारक ठाम होते विविध प्रश्नावरती ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांच्या वर अक्षरशा प्रश्नाचा भडीमार केला रस्ते प्राधिकरण व्यवस्थापकांनी तात्पुरतं दोन महिने दहा किलोमीटर परिघातील गावांना पूर्वीप्रमाणे टोलमुक्ती देण्याचा बैठकीत जाहीर केले या संदर्भात अहवाल वरिष्ठ पातळीवरती राज्य शासन व केंद्र शासनाला पाठवण्याचा निर्णय त्यांनी घेतला वरिष्ठ पातळीवरील जो निर्णय होईल मान्य करावा लागेल असेही सांगण्यात आले तात्पुरता टोल प्रश्नावरती तोडगा निघाला आहे कायमस्वरूपी टोल माफीच्या निर्णयावर नागरिक ठाम आहेत